पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये देशाला संबोधित केले. या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मन की बातमध्ये ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शौर्याबद्दल सांगितले. त्यांनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शेवटच्या पत्रावर चर्चा केली. त्यांनी ते पत्र विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिले असावे, पण त्यांनी ते सर्वांना उद्देशून लिहिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन वर्षात चांगले होण्याची शपथ घ्या, असेही पंतप्रधान म्हणाले.
“माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार! यावेळी तुम्ही २०२१ च्या निरोपाची आणि २०२२ च्या स्वागताची तयारी करत असाल. नवीन वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, येत्या वर्षात काहीतरी चांगले करण्याचा, अधिक चांगला करण्याचा संकल्प घेते. गेली सात वर्षे आमची ‘मन की बात’ देखील आम्हाला व्यक्ती, समाज, देशातील चांगल्या गोष्टी अधोरेखित करून चांगले काम करण्याची आणि चांगले बनण्याची प्रेरणा देत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“आपले शास्त्रज्ञ नवीन ओमायक्रॉन प्रकाराचा सतत अभ्यास करत आहेत. त्यांना रोज नवीन डेटा मिळत आहे, त्यांच्या सूचनांवर काम केले जात आहे. अशा परिस्थितीत, स्वतःची जागरूकता, स्वतःची शिस्त, करोनाच्या या प्रकाराविरूद्ध देशाकडे मोठी शक्ती आहे. केवळ आपली सामूहिक शक्तीच करोनाला हरवेल, ही जबाबदारी घेऊन आपल्याला २०२२ मध्ये प्रवेश करायचा आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये सांगितले की, “यावर्षीही परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा माझा विचार आहे. या कार्यक्रमाची नोंदणी देखील दोन दिवसांनंतर MyGov.in वर २८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही नोंदणी २८ डिसेंबर ते २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी इयत्ता नववी ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाइन स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. तुम्ही सर्वांनी यात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
“पुस्तके केवळ ज्ञानच देत नाहीत, तर व्यक्तिमत्त्व आणि जीवनाला आकार देतात. पुस्तके वाचण्याच्या छंदातून एक विलक्षण समाधान मिळते. आजकाल मला लोक अभिमानाने म्हणताना दिसतात की मी या वर्षात इतकी पुस्तके वाचली आहेत. आता मला ही आणखी पुस्तके वाचायची आहेत. हा एक चांगला ट्रेंड आहे, जो आणखी वाढवला पाहिजे. मन की बात च्या प्रेक्षकांना तुमच्या या वर्षातील पाच पुस्तकांबद्दल सांगायचे आहे जी तुमची आवडती आहेत. अशा प्रकारे, २०२२ मध्ये तुम्ही इतर वाचकांना चांगली पुस्तके निवडण्यात मदत करू शकाल. ज्या काळात आपला स्क्रीन टाईम वाढत आहे, त्यावेळी पुस्तक वाचन अधिकाधिक लोकप्रिय करायचे आहे. त्यासाठीही आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.