Muhammad Yunus asks PM Modi to stop Sheikh Hasina from speaking : शेख हसीना यांची ऑनलाईन भाषणे बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे अंतरिम मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. हसीना यांची भाषणांमुळे बांगलादेशात संतापाची भावना उसळत असल्याचा दावा युनूस यांनी केला आहे.
लंडन येथील चॅथम हाऊस (Chatham House) येथे एका चर्चेदरम्यान बोलताना युनूस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. “जेव्हा मला पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली , तेव्हा मी फक्त असे म्हणालो की तुम्हाला जर त्यांचे आतिथ्य करायचे असेल, तर मी ते धोरण सोडून देण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकू शकत नाही… पण कृपया त्या ज्या पद्धतीने बांगलादेशातील लोकांना संवाद साधत आहेत, तशा पद्धतीने त्या बोलणार नाहीत याची काळजी घेत आम्हाला मदत करा,” असे हसीना यांच्या भारतातील भाषणांचा संदर्भ देत युनूस म्हणाले.
“त्यांनी घोषणा करतात की या-या दिवशी आणि या वेळेला त्या बोलतील आणि संपूर्ण बांग्लादेश प्रचंड संतापतो. त्या हा संपूर्ण राग मनात का ठेवत आहेत?” असेही युनूस म्हणाले.
युनूस म्हणाले की त्यांनी पंतप्रधान मोदी यांना यामध्ये हस्तक्षेप करण्यास आणि हसिना यांना भविष्यात अशी विधाने करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले. ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं ही, “हा सोशल मिडिया आहे, तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.” यावर युनूस हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “तुम्ही काय बोलू शकता? ही एक स्फोटक परिस्थिती आहे, तुम्ही फक्त हा सोशल मीडिया असल्याचे सांगून अंग झटकू शकत नाहीत.”
भारत बांगलादेशच्या अपेक्षेप्रमाणे वागत आहे का असे विचारले असता युनूस यांनी याला लगेच नाही असे उत्तर दिले. तसेच त्यांनी बांगलादेशने हसीना यांच्या प्रत्यार्पणासंबंधी विनंती करणारे पत्र भारत सरकारला लिहील्याचीही पुष्टी केली आणि यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया आधीच सुरू असल्याचेही सांगितले.