मुझफ्फरनगर हिंसाचारप्रकरणी राज्य पोलिसांनी थंड भूमिका घेतल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून त्यासंदर्भात खुलासा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारला दिला. राजकीय दबावापोटीच पोलिसांनी जातीय िहसाचार आटोक्यात आणण्याकामी पोलिसांनी थंड भूमिका घेतली, असा आरोप करण्यात आला होता.
केवळ राजकीय दबावापोटीच पोलिसांनी मुझफ्फरनगरमधील हिंसाचार आटोक्यात आणण्याकामी खंबीर घेतली नसल्याचे एका वृत्तवाहिनीवरून दाखविण्यात आले होते. या मुद्दय़ाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने अखिलेश यादव सरकारला नोटीस धाडली आहे.
अत्यंत गंभीर आरोप
‘हे आरोप अत्यंत गंभीर असून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. राज्य सरकारने यावर आपले मतप्रदर्शन केले पाहिजे, असे सरन्यायाधीश पी. सत्यशिवम् यांनी सांगितले. राज्य सरकारने यावर येत्या १७ ऑक्टोबपर्यंत आपले उत्तर द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडमून स्पष्टीकरण मागविले
मुझफ्फरनगर हिंसाचारप्रकरणी राज्य पोलिसांनी थंड भूमिका घेतल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून त्यासंदर्भात खुलासा करावा,

First published on: 27-09-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muzaffarnagar riot sc seeks explanation from akhilesh government