पीटीआय, नवी दिल्ली

देशामध्ये गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात होऊन नऊ वर्षे झाली. मात्र, या काळात देशातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ नाहीत असे मत बहुसंख्य भारतीयांनी व्यक्त केले आहे. समाजमाध्यमावरील ‘लोकल सर्कल’ या समुदाय व्यासपीठाने देशातील ३४१ जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे.

warna, droupadi murmu, Kolhapur,
कोल्हापूर : राष्ट्रपती रविवारी वारणेच्या दौऱ्यावर; पाऊस झेलत शासकीय यंत्रणा कार्यरत
indices Sensex and Nifty fall for fifth session
मंदीवाल्यांच्या माऱ्यातही ‘सेन्सेक्स’ ८० हजारांवर तगून! सलग पाचव्या सत्रात निर्देशांकांत घसरण
budget 2024 : education,
मोठी घोषणा..! उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकार करणार १० लाखांपर्यंतची मदत
Mahawachan Utsav 2024, schools,
महानायक अमिताभ बच्चन करणार वाचनाचा जागर… काय आहे उपक्रम?
How Sierra Leone plans to stop child marriage
पाहुणे, वऱ्हाडी, वाजंत्री सगळ्यांनाच होणार शिक्षा! ‘या’ देशाने बालविवाह बंदीसाठी केलेला कठोर कायदा का आला चर्चेत?
Services sector performance expanded in June
जूनमध्ये सेवा क्षेत्राच्या कामगिरीत विस्तार
Madhya Pradesh Alirajpur suicide
मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा गळफास, बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती, तारीखही तीच
Navdharavi for all the undeserving slum dwellers Demand for about 1200 acres of land from government
सर्व अपात्र झोपडीवासीयांसाठी ‘नवधारावी’! शासनाकडून सुमारे १२०० एकर भूखंडाची मागणी?

आपल्या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक शौचालयाची उपलब्धता वाढली आहे असे सुमारे ४२ टक्के लोकांनी सांगितले. पण त्यांची स्थिती चांगली नसल्याचे मत ५२ टक्के लोकांनी व्यक्त केले. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ३७ टक्के लोकांच्या मते सार्वजनिक शौचालय साधारण किंवा कामापुरते ठीक आहे, २५ टक्के लोकांनी ते सरासरीपेक्षा वाईट, क्वचितच काम करत असल्याचे सांगितले, १६ टक्के लोकांना ते भयानक वाटले आणि १२ टक्के लोकांनी सांगितले की ते इतके वाईट होते की ते वापर न करताच बाहेर आले.

हेही वाचा>>>राहुल गांधींची पंजाबमध्ये अध्यात्मिक भेट, गोल्डन टेम्पलमध्ये घासली भांडी; पाहा VIDEO

सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याऐवजी एखाद्या व्यावसायिक आस्थापनामध्ये जाऊन तेथील शौचालयाचा वापर करण्यास प्राधान्य देऊ असे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य लोकांनी सांगितले. मुंबई, दिल्ली किंवा बंगळूरु यासारख्या शहरांमध्ये सुलभ शौचालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेने व्यवस्थापन केलेले नसेल तर सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे एखाद्य दु:स्वप्नासारखे असते असेही या सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. ३४१ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये ३९ हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला.