पीटीआय, जयपूर : ‘‘पाकव्याप्त काश्मीर (पीओके) स्वत:हून भारतात येईल. थोडी प्रतीक्षा करा,’’ असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह सोमवारी व्यक्त केला. भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान दौसा येथे पत्रकारांशी संवाद साधताना सिंह बोलत होते.

 ‘जी-२०’ शिखर परिषदेविषयी बोलताना सिंह म्हणाले, की या शिखर परिषदेच्या दिमाखदार आयोजनाने भारताने जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटवला. अवघ्या जगात आपली क्षमता सिद्ध केली. ही शिखर परिषद सर्वार्थाने अभूतपूर्व झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले. ‘जी-२०’ राष्ट्रगटात जगातील सर्व शक्तिशाली देशांचा समावेश असून, या सर्वच देशांनी भारताची  मुक्त कंठाने प्रशंसा केली.

hazaribagh sinha family haunts bjp loksabha
भाजपाला हजारीबागच्या ‘या’ कुटुंबाची भीती? कारण काय?
cm yogi adityanath marathi news
“सत्ता आल्यास ६ महिन्यांत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ”, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्धार
Deputy Chief Minister Devendra Fadnavis appeal to workers regarding winning Thana seats
ठाण्याची जागा जिंका, मुख्यमंत्र्यांसोबत गुलाल उधळायला येतो ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
The people of Dharavi will benefit from rehabilitation Rahul Shewale
उमेदवारांची भूमिका- दक्षिण मध्य मुंबई; पुनर्वसनातून धारावीकरांचा फायदाच होईल- राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट)
Jaganmohan, Chandrababu Naidu,
आंध्रमध्ये सत्तेत जगनमोहन की चंद्राबाबू ?
devendra fadnavis public meeting in patan for mahayuti candidate udayanraje bhosale
ज्या देशाचा नेता सक्षम तोच देश प्रगतीपथावर; देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
prajwal revanna case
Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

सिंह म्हणाले, की या परिषदेत ‘जैवइंधन आघाडी’बाबत मोदींच्या नेतृत्वाखाली मिळालेले यश भारताला आर्थिक सबळ बनवणार आहे. राजस्थान सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सध्याच्या काँग्रेस सरकारच्या काळात राजस्थानात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. युवक आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली गेली नाहीत.