भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेले संशयाचे वातावरण निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये औपचारीक चर्चा सुरू व्हावी, यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे परराष्ट्रमंत्रालयातील प्रवक्ते अजिझ चौधरी यांनी पत्रकरांना सांगितले.
भारताबरोबर संवाद सुरू करण्यासाठी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी माजी कुटनीतिज्ञ शहरीयार खान यांची नियुक्ती केली आहे. खान यांनी नुकताच भारत दौरा केला. दोन्ही देशातील परस्पर संबंध सुधारावेत, अशी पाकिस्तानमधील नेते मंडळींची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढील चर्चेसाठी दोन्ही देशातील आधिकारी तारखांची जुळवाजुळव करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jul 2013 रोजी प्रकाशित
भारताबरोबर औपचारीक चर्चेला पाकिस्तान उत्सुक
भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेले संशयाचे वातावरण निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये औपचारीक चर्चा सुरू व्हावी, यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे परराष्ट्रमंत्रालयातील प्रवक्ते अजिझ चौधरी यांनी पत्रकरांना सांगितले.
First published on: 19-07-2013 at 05:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan wants resumption of composite dialogue with india