एक्स्प्रेस वृत्त, बंगळूरु

मार्च महिना संपण्यापूर्वीच देशात पाणीटंचाई जाणविण्यास सुरुवात झाली आहे. आयटी-सिटी असा लौकिक असलेल्या कर्नाटकच्या राजधानी बंगळूरुमध्ये चक्क पाणीवापरावरून २२ जणांना दंड ठोठविण्यात आला आहे. तीन दिवसांतील या कारवाईत १.१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

IPL 2025
IPL 2025: फ्रँचायझींच्या तीन मोठ्या मागण्या, ५ वर्षांनी होणार महालिलाव? RTM बाबतही संघमालक आग्रही
Gold prices, Budget, Gold prices fall,
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात आपटी, हे आहेत आजचे दर
dams that supply water to mumbai have more storage than last year
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत ३५ टक्के साठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा
three m paper boards to raise over rs 39 crore through ipo
Three M Paper Boards IPO : थ्री एम पेपर बोर्ड्स ‘आयपीओ’तून ३९.८३ कोटी उभारणार
Record volume of supplemental demands Demands of around one lakh crores for various schemes print politics news
पुरवणी मागण्यांचे आकारमान विक्रमी? विविध योजनांसाठी सुमारे एक लाख कोटींच्या मागण्या
Mumbai, Inspection, new buildings,
मुंबई : नव्या इमारतींची आयआयटीकडून तपासणी, ताबा घेतलेल्या म्हाडाच्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये बदल
32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo
विश्लेषण : सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची निधी उभारणी… आयपीओ बाजारातील तेजी कुठवर?
youth of thane addicted to drugs school students soft target for drug peddlers
ठाणे : लक्ष्य शाळकरी मुले!

बंगळूरुला पाण्याचा पुरवठा हा प्रामुख्याने कावेरी नदीतून केला जातो. याखेरीज महापालिकेने खणलेल्या कूपनलिकांचा वापर शहराची पाण्याची गरज भासविण्यासाठी केला जातो. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईचे सावट आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा व निस्सारण मंडळाने पिण्याच्या पाण्याचा अन्यत्र वापर करण्यावर बंदी घातली आहे. शुक्रवारपासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून रविवापर्यंत. केवळ ३ दिवसांत २२ जणांकडून जागीच १ लाख १ हजार रुपये दंडापोटी घेण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक, ६५ हजारांचा दंड हा एकटया दक्षिण-पूर्व भागातून वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> द्रविडी पक्षांच्या संघर्षांत तमिळनाडूत भाजपचा शिरकाव करण्याचा प्रयत्न

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा जमिनीतील गोडया पाण्याची पातळी कमालीची घटली असून ५० टक्क्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी गाडया धुण्याबरोबरच बांधकाम, कारंजी, चित्रपटगृहे किंवा मॉलमध्ये मनोरंजन आदीसाठी गोडया पाण्याचा वापर करण्यावर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

पाण्याची गरज आणि पुरवठा..

* बंगळूरु शहराची लोकसंख्या अंदाजे १.४० कोटी

* रोजची गरज सुमारे २,६०० दशलक्ष लिटर

* कावेरी नदीतून दररोज १,४५० दशलक्ष लिटर पुरवठा

* कूपनलिकांमधून दररोज ४०० दशलक्ष लिटर पुरवठा