भाजपाने मागील पाच वर्षात काहीही कामं केली नाहीत. लोक त्यामुळे नाराज झाले आहेत. त्याचमुळे लोक आता आमच्यासोबत आहे. लोकांनी आम्हाला साथ देण्याचे नक्की केले आहे. आता आम्ही भाजपा विरोधात लोकसभेची निवडणूकही लढणार आहे असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. पाच राज्यातल्या या निवडणुकांचे निकाल म्हणजे महाआघाडीसाठी दिलासादायक चित्र आहे या जोरावर आम्ही भाजपाला टक्कर देऊ शकतो असेही चंद्राबाबू नायडूंनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

एवढंच नाही तर तेलंगणाच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याचा आम्हाला आदर आहे असेही चंद्रबाबू नयाडू यांनी म्हटले आहे तसेच निवडून आलेल्या सगळ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People recognize that bjp has done nothing in last 5 yrs and moving towards alternative says andhra cm n chandrababu naidu
First published on: 11-12-2018 at 16:21 IST