मागील काही महिन्यांत मणिपूरमधील हिंसाचारात अनेक नागरिकांचा जीव गेला. तसेच महिलांवर अत्याचाराच्या घटनाही घडल्याचं समोर आलं. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरात मणिपूर हिंसाचाराचा विषय चर्चेत आला. आज (१५ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ला येथे साजरा होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं. तसेच काही दिवसांपासून तेथे शांतता प्रस्तापित झाली आहे, असं नमूद केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “मागील काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित झाल्याची बातमी येत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे.”

व्हिडीओ पाहा :

“शांततेतूनच मणिपूर हिंसाचारावर मार्ग निघेल”

“मणिपूरमधील लोकांनी मागील काही दिवसांपासून शांतता प्रस्थापित केली आहे. त्यांनी हे शांततेचं पर्व पुढे न्यावं. शांततेतूनच या प्रश्नावर मार्ग निघेल. राज्य आणि केंद्र सरकार त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भरपूर प्रयत्न करत आहे आणि करत राहील,” असं मोदींनी म्हटलं.

हेही वाचा : Independence Day 2023 Live : आपला भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही ठरला- मोदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देशातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कल्पनेच्या पलिकडील संकटं”

“देशातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे कल्पनेच्या पलिकडील संकटं निर्माण झाली. यात अनेक कुटुंबांना नुकसान सहन करावं लागलं. त्या कुटुंबांप्रती मी संवदेना व्यक्त करतो. राज्य-केंद्र सरकार एकत्र येऊन त्या सर्व संकटांवर मात करत वेगाने विकासाकडे आगेकुच करेल, असा मी विश्वास व्यक्त करतो,” असंही मोदींनी नमूद केलं.