पीटीआय, हैदराबाद

‘‘देशातील द्वेषाचे वातावरण संपवण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे आवश्यक आहे,’’ असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केले. तेलंगणामधील नामपल्ली येथे एका निवडणूक सभेत बोलताना  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), पंतप्रधान मोदी आणि कट्टरपंथीयांनी देशभर द्वेष पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसने आपल्या ‘भारत जोडो यात्रे’त ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान खुले करण्याचा’ नारा दिला होता, याची आठवण राहुल यांनी यावेळी करून दिली. ‘बीआरएस’, भाजप आणि ‘एआयएमआयएम’ संगनमताने परस्परपूरक काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
Expulsion of Ravikant Tupkar from Swabhimani Farmers Association Pune
रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी
Jitendra Awhad, amit shah, corruption,
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका
Nagpur, smart prepaid meters, Devendra Fadnavis, Anti Smart Electric Meter Citizen Struggle Committee, Mahavitaran, protest, electricity sector
सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
Rahul Gandhi debut as Leader of the Opposition first speech aggression
राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?

आपण पंतप्रधान मोदींविरोधात लढत असल्यामुळे आपल्यावर २४ गुन्हे दाखल झाल्याचा दावा करून राहुल म्हणाले, की ‘‘मानहानी प्रकरणात एखाद्या व्यक्तीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी निवासस्थान हिसकावले गेले’’.हा लढा वैचारिक आहे आणि मी त्यात तडजोड करू शकत नाही, असे सांगून राहुल यांनी त्यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. हैदराबादचे खासदार असलेल्या ओवेसींविरुद्ध किती गुन्हे दाखल आहेत? ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’सारख्या सरकारी तपास यंत्रणा नेहमीच आपला पिच्छा पुरवतात. पण ओवेसी यांच्यावर कोणत्याही यंत्रणेने आतापर्यंत कारवाई केली आहे का? ओवेसींविरुद्ध एकही गुन्हा-खटला दाखल का झालेला नाही? ओवेसी पंतप्रधान मोदींना मदत करतात, हेच या मागचे खरे कारण आहे असे राहुल म्हणाले.