नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची निमंत्रणाअभावी गैरहजेरी, चीनने लडाखमध्ये बळकावलेला कथित भूभाग, ‘मेक इन इंडिया’चे अपयश, सरसंघचालकांचे स्वातंत्र्यासंदर्भातील वादग्रस्त विधान, भाजपमधील ओबीसी खासदारांची कोंडी अशा तमाम मुद्द्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी सभागृहात केंद्र सरकारला चहुबाजूंनी घेरले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी चौफेर फटकेबाजी करत असताना, पंतप्रधान मोदी सभागृहात हजर होते. त्यामुळे सत्ताधारी सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले होते.

राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
AAP leaders discussing strategies while expressing confidence about winning in Delhi, leaving room for collaboration with Congress.
“दिल्ली जिंकण्याचा आत्मविश्वास”, तरीही आम आदमी पक्ष काँग्रेसच्या संपर्कात का?
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे मोदींच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी गेले होते, असा आरोप राहुल गांधींनी केला. मात्र, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ‘एक्स’वरून राहुल यांचा आरोप फेटाळला.

भाजपमधील ओबीसींची कोंडी!

भाजपमध्येही ओबीसी खासदार आहेत पण, त्यांना बोलण्याची मुभा नाही. भाजपच्या राज्यामध्ये ओबीसींना संधी मिळत नाही असा आरोप राहुल यांनी केला. त्यावर, ‘पंतप्रधान स्वत: ओबीसी असून तुम्हाला ते दिसत नाहीत का’, असा प्रतिसवाल भाजपच्या सदस्यांनी केला. संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली.

राहुल गांधी खोटे दावे करून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करत आहेत. २०२४मधील अमेरिकेतील दौऱ्यामध्ये मोदींच्या आमंत्रणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मोदी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहात नाहीत हे सर्वांना माहिती आहे. – एस जयशंकर, परराष्ट्रमंत्री

आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो तर, मोदींना आमंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारला जयशंकर यांना अमेरिकेला पाठवावे लागले नसते. उलट, अमेरिकेच्या अध्यक्षांनीच भारतात येऊन मोदींना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले असते. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेता, लोकसभा

खरगेंच्या विधानामुळे गदारोळ

महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो भाविकांचा बळी गेल्याचा दावा राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सभागृहात केला. या वादग्रस्त विधानावर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत सभागृहात प्रचंड गदारोळ केला. सभापती जगदीप धनखड यांनी खरगेंना त्यांचे विधान मागे घेण्याची विनंती केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेतील भाषणामध्ये खरगेंनी कुंभमेळ्यातील मृतांचा आकडा केंद्र सरकार लपवत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. या चेंगराचेंगरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असावा असा माझा अंदाज आहे. माझे म्हणणे चुकीचे असेल तर केंद्र सरकारने मृतांचा नेमका आकडा प्रसिद्ध करावा असे खरगे म्हणाले. ‘‘विरोधी पक्षनेत्यांनी हजारोंचा आकडा दिला आहे. तुम्ही सभागृहात जे बोलता ते अत्यंत महत्त्वाचे असते. तुमच्या बोलण्याने सर्वांना धक्का बसला आहे,’’ असे सभापती धनखड म्हणाले.

Story img Loader