पॅसिफिक बेटांवर असलेले देश आत्तापर्यंत करोनाच्या प्रादुर्भावापासून लांब होते. मात्र परदेशांमधून येणाऱ्या पर्यटकांमुळे आता या देशांमध्येही करोनाचा प्रसार झाला आहे. दोन वर्षांपासून करोनाच्या तावडीतून सुटलेल्या या बेटांना आता मात्र करोनाचा फटका बसला आहे. किरीबाती आणि समोआ या देशांमध्ये आता लॉकडाउन लावण्यात आला आहे.

आत्तापर्यंत किरीबातीमध्ये एकाही करोना रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर समोआमध्ये आत्तापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळले होते. मात्र विदेशातून आलेल्या लोकांमुळे इथंही करोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने संपूर्ण लॉकडाउन लावला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, फिजीवरून काही नागरिक विमानाने किरीबातीला आले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासावरची बंदी उठवल्यानंतरचं हे पहिलंच उड्डाण होतं. हे ३६ प्रवासी करोनाबाधित आढळून आल्याने या देशामध्ये आता करोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे.

russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Accidental death of a 9 year old boy after a rickshaw with more than capacity passengers overturned panvel
पनवेल: क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षा कलंडल्याने ९ वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू

हेही वाचा – COVID : देशभरात २४ तासात ३ लाख ३७ हजार ७०४ जण करोनाबाधित ; ४८८ रूग्णांचा मृत्यू

तर समोआ देशात ब्रिस्बेनहून परत येणाऱ्या विमानातून आलेल्या प्रवाशांमार्फत करोनाचा प्रसार झाल्याने जेव्हा देशात १५ रुग्ण आढळून आल्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आल्याची माहिती पंतप्रधान फियाम नाओमी माताफा यांनी दिली. सोमवारी रात्री हे सर्व निर्बंध दूर करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तर बाधित आढळलेले सर्वच्या सर्व रुग्ण हे ओमायक्रॉनचे असून ते सध्या विलगीकरणात असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

किरीबातीमध्ये अनिश्चित काळासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. इथल्या ३४ टक्के जनतेने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर समोआ देशात पूर्णतः लसीकृत झालेल्या नागरिकांचं प्रमाण ६२ टक्के आहे.