रोहिंग्या निर्वासितांच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे निघत असतानाच केंद्र सरकारने रोहिंग्या मुस्लिमांविरोधात कणखर भूमिका कायम ठेवली आहे. रोहिंग्या मुस्लिम भारतात कायम राहिल्यास देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग अशा स्थितीत देशातील नागरिकांचे रक्षण कोण करणार, असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात सध्या रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न गाजत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. देशाचे रक्षण करायचे असल्यास परदेशातील नागरिकांना भारतात कायमस्वरुपी ठेवता येणार नाही. रोहिंग्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohingyas muslim issue in india if they stay permanently who will protect citizens asks mos home hansraj ahir
First published on: 13-09-2017 at 15:53 IST