पाच राज्यांतील निवडणुकांचा कल समोर आला आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपाने सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला अवघ्या एका राज्यातच यश मिळालं. त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात या विरोधकांच्या मागणीला जोर आलाय. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज पुन्हा जोर दिला. तसंच, यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांवरही टीका केली. आज ते दिल्लीत असून तेथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएमबाबत भाजपानेच शंका उपस्थित केली होती. काँग्रेस राजवटीच्या काळात हा मुद्दा सगळ्यात आधी सुब्रमण्यम स्वामी, किरीट सोमय्या यांनीच कोर्टात नेला होता. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरता याचिका केली होती. यावर शिवसेनेने आवाज उठवावा म्हणून सोमय्या प्रेझेंटन्शन घेऊन शिवसेना भवनात आले होते. डॉ.स्वामी आले होते. डॉ. स्वामींचं यावरचं पुस्तक वाचा.

A case has been registered at the Navrangpura police station. (Representational Image)
नोटांवर महात्मा गांधींचा नाही तर अनुपम खेरांचा फोटो, सराफा व्यापाऱ्याची १.३० कोटींची फसवणूक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”

तसंच, “उद्धव ठाकरे म्हणाले की शंकांचं निरसन करायचं असेल तर देशातील कोणतीही एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. पोस्टल वोटिंग बॅलेट पेपरवर येतात. त्यामध्ये १९९ जागांवर काँग्रेस आघाडीवर होती. मग आमचा ईव्हीएमवर विश्वास कसा बसेल?” असा प्रश्नही राऊतांनी विचारला.

हेही वाचा >> संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना पत्र, “महाराष्ट्राच्या आरोग्यसेवेचे धिंडवडे..” म्हणत केले ‘हे’ आरोप

इंडिया आघाडीची बैठक ढकलली

पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर इंडिया आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा सावकरण्याकरता नवी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी ही बैठक होणार होती. या बैठकीला आज ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार होते. परंतु, इतर नेत्यांना आज वेळ नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, आज इंडिया आघाडीची बैठक होणार होती. मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला येणार होते. परंतु, इतर नेत्यांना आज येणं शक्य नव्हतं. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक १६ किंवा १८ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. जे काही समज-गैरसमज दाखवले जात आहेत, पण तसे नाहीय, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.