पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्भय वृत्तीचे आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. गुलामगिरी कदापिही मान्य नसलेली त्यांची मानसिकता होती,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. ‘मन की बात’ या  संवादसत्रात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.

मोदी म्हणाले, की आज २८ मे. थोर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांची जयंती. सावरकरांचे बलिदान, धैर्य आणि दृढनिश्चय आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या पराक्रमाच्या कथा, धैर्य आणि संकल्प आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी आहे. वीर सावरकरांना ज्या अंदमानातील कोठडीत अनेक वर्षे ठेवले होते, त्यांनी काळय़ा पाण्याची खडतर शिक्षा भोगली होती, तेथे मी भेट दिली. तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
cabinet minister nitin gadkari news
पुढील पंतप्रधान तुम्ही होणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं…

मोदींनी सांगितले, की सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात विशाल सामर्थ्यांचे दर्शन घडते. त्यांचा  निडर आणि स्वाभिमानी स्वभाव गुलामगिरीची मानसिकता अजिबात सहन करू शकला नाही. केवळ स्वातंत्र्य चळवळीतच नव्हे तर सावरकरांनी सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी अविस्मरणीय योगदान दिले. रविवारी सावरकर जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.