गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हा आमदार, खासदारांच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ठाकरे गटाच्या याचिकेवर आज ( १८ सप्टेंबर ) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. यावेळी, “तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे.

Abhijit Gangopadhyay and Mamata Banerjee
“ममता बॅनर्जी तुमची किंमत किती?”, माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान
Swati Maliwal has accused Delhi CM Arvind Kejriwal
केजरीवालांच्या घरी ‘आप’ च्या महिला खासदारांना मारहाण; कारण काय? कोण आहेत स्वाती मालीवाल?
Arvind Kejriwal News
“भाजपाचा विजय झाला तर उद्धव ठाकरेसंह इतर नेते तुरुंगात जातील”, मोदींच्या मोहिमेविषयी केजरीवाल काय म्हणाले?
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत म्हणाले, “निवडणूक प्रचार करणं हा…”
Eknath Shinde Raj Thackeray
“माझ्या पक्षाचं चिन्ह न्यायालयातून…”, राज ठाकरेंचा शिंदे गटाला टोला; शिवसेनेच्या ऑफरबाबत म्हणाले…
Supreme Court
“सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
Hearing on Arvind Kejriwal petition today
केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी
vanchit, Amol Kolhe, court,
अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी विरोधात ‘वंचित’ न्यायालयात जाणार, जाणून घ्या कारण

हेही वाचा :


देश-विदेश

“…म्हणून विधानसभा अध्यक्षांनी १४ सप्टेंबरला सुनावणी घेतली”, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!

नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद वकील कपिल सिब्बल म्हणाले, “शिवसेना चिन्हाचे प्रकरण तुम्हाला ऐकावं लागेल. कृपया तारीख निश्चित करावी.”

त्यावर, “तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. “११ मे च्या निकालानंतर काहीही झालेलं नाही. ठराविक वेळेत घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटलं होतं. पण, ११ मेनंतर काहीही झालं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

हेही वाचा : “११ मे पासून आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी काय केलं?” आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल

“विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाला उत्तरदायी आहेत. तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावं लागेल. एक आठवड्यात सुनावणी घ्या. दोन आठवड्यात काय कारवाई केली, ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं.