जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स प्रकरणामुळे बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अॅम्बेसिडर बनविण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने टाळल्याचे सांगण्यात येत आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या माहितीवरून याबाबतचे वृत्त दिले आहे.

जागतिक शोधपत्रकारितेच्या इतिहासात सर्वात मोठे ठरावे असे ‘पनामा पेपर्स’ प्रकरण जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह जगातील अनेक नामांकित माध्यमसमूहांनी उजेडात आणले होते. आपली मालमत्ता लपविण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा येथे कंपन्या स्थापन केलेल्या कंपन्यांशी निगडीत ५०० भारतीयांची नावे समोर आली होती. यात प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्याची सून ऐश्वर्या राय बच्चनचेही नाव पुढे आले होते. त्यामुळेच सरकारने सावध भूमिका घेत अमिताभ यांना अत्युल्य भारतचे ब्रँड अॅम्बेसिडर बलविण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. यामुळे पुढील कालावधीसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अतुल्य भारतची एकमेव ब्रँड अॅम्बेसिडर असेल.

how did Ujjwal Nikam enter politics
प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?
Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
Government failure to take action against misleading companies Supreme Court verdict on Patanjali case
दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत सरकार अपयशी; पतंजली प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशोरे

दरम्यान, पनामा पेपर्स प्रकरणात पुढे आलेल्या तब्बल ५०० भारतीयांची नावे पुढे आल्याने केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन चौकशीत निर्दोष आढळल्यानंतरच अतुल्य भारतसाठी त्यांच्या नावाचा फेरविचार केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.