पंजाबमधील पतियाला येथे आज दुपारच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान संघर्ष जाला. शिवसेनेनं खलिस्तानी गटांविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान हा सारा गोंधळ घडला. पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हशिष सिंघेला यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चावर दगडफेक करण्यात आली. या संघर्षामध्ये तलावारीही उपसण्यात आल्याने वातावरणामध्ये तणाव निर्माण झालेला.

काही शीख गटांच्या लोकांचा शिवसैनिकांसोबत या मोर्चादरम्यान वाद झाला. दोन्हीकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला. शिवसैनिक ‘खलिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत होते. त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलावारी घेऊन उतरले. पाहता पाहता अचानक दगडफेक सुरु झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

या मोर्चामधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये लोक तलवारी उपसून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. काहीजण पोलिसांशी वाद घालत आहेत तर काही दगडफेक करताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंदिराच्या बाजूच्या इमारतीवर उभी राहून खाली जमलेल्या लोकांवर दगडफेक करताना दिसत आहे.

या सर्व गोंधळावर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस निर्देशकांशी आपली चर्चा झाल्याची माहिती दिली. तसेच या परिसरामध्ये सध्या शांतता आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. “पतियालामध्ये घडलेला प्रकार दुर्देवी आहे. मी डीजीपींसोबत बोललो आहे. या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यात आलीय. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यावर आमचं लक्ष आहे. पंजाबची शांतता सर्वात महत्वाची आहे,” असं मान यांनी म्हटलंय.

या प्रकरणानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी दोन्ही गटातील लोकांना शांतता बाळगण्याचं आव्हान करत आपआपसातील वाद आणि मतभेद चर्चेने सोडवण्याचं आवाहन केलंय.