डेहराडून : देशाच्या सीमेवरील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये येणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या मागे शत्रूंचा हात आहे का याचा तपशीलवार अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी व्यक्त केले. या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटे वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

हेही वाचा >>> भाजप आदिवासीविरोधी असल्याचा आरोप

Fight between political contractors to get the work of street lights in 27 villages near Dombivli
डोंबिवली जवळील २७ गावांमधील पथदिव्यांचे काम घेण्यासाठी राजकीय ठेकेदारांमध्ये चढाओढ
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Pakistan s balochistan terror attacks
अन्वयार्थ: रक्तलांछित बलुचिस्तान
Loksatta lokjagar politics maharashtra Vidarbha Devendra Fadnavis
लोकजागर: वर्चस्ववाद व खच्चीकरण!
Bhayandar, Shiv Sena Thackeray group, Clash Between Two Women Leaders, fight, viral video,
Video: भाईंदरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
Raksha Bandhan 2024 festival Crowd to take Raksha Bandhan in markets of Thane city
राख्यांवर मुख्यमंत्र्यांची छबी… रक्षाबंधनाला राजकीय रंग!
20 percent increase in hernia in youth
तरूणांमध्ये हर्नियाच्या त्रासात २० टक्के वाढ!
Sheikh Hasina head of state in Bangladesh in the Indian subcontinent has always faced conflict
उठाव, बंड, हत्या… भारतीय उपखंडातील महिला राष्ट्रप्रमुखांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष?

उत्तराखंडमधील जोशीमठाच्या जवळ धाक या गावामध्ये एका पुलाच्या उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. ते म्हणाले की, हवामान बदल ही केवळ वातावरणाशी संबंधित घडामोड उरलेली नसून ती आता राष्ट्रीय सुरक्षेशी जोडली गेली आहे. यावेळी त्यांनी सीमाभागामध्ये पायाभूत सुविधांशी संबंधित अन्य ३४ प्रकल्पांचे उद्घाटन केले.  वाढत्या नैसर्गिक संकटांबद्दल कोणत्याही देशाचे थेट नाव न घेता राजनाथ सिंह म्हणाले की, ‘‘उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि लडाखसारखी काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटांचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की ते हवामान बदलाशी संबंधित आहे. पण मला असे वाटते की, त्यामध्ये आपल्या शत्रूची काही भूमिका आहे का शोधण्यासाठी अभ्यासाची गरज आहे’’. संरक्षण मंत्रालयाने ही नैसर्गिक संकटे वाढत असल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे असेही त्यांनी सांगितले. मित्रत्वाचे संबंध असलेल्या देशांच्या मदतीने याचा तपशीलवार अभ्यास करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.