वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी तेलंगण विधेयकाच्या मसुद्यावर मतदान घेण्याची मागणी अमान्य करण्यात आल्यानंतर आंध्र प्रदेश विधानसभेतून सभात्याग केला. वायएसआर काँग्रेसच्या या कृतीला सर्व पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक २०१३ विधेयकावरील चर्चेवर वायएसआर काँग्रेस पळ काढीत आहे असा इतर पक्षांचा आरोप आहे. वायएसआर काँग्रेसचे सदस्य शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापतींसमोरच्या जागेत गोळा झाले व त्यामुळे कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले. जेव्हा पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा विजया यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला.