देशात धार्मिक सण उत्सव काळात मंदिरांमध्ये भाविकांच्या चेंगराचेंगरी प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि संबंधित राजसरकारला चांगलेच धारेवर धरले. यापुढे मंदिरांतील चेंगराचेंगरी प्रकरणे खपवून घेतली जाणार नाहीत. त्यासाठी योग्य नियोजन आणि सुरक्षाव्यवस्थेची काळजी संबंधित राज्यसरकारने घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पी.सत्यशीवम् यांनी केंद्र आणि राज्यांच्या प्रशासनाला नोटीस धाडली आहे. यानुसार, सणउत्सव काळात संबंधित राज्यांच्या सरकारने मंदिरांतील गर्दीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी घ्यावी असे म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘मंदिरांतील चेंगराचेंगरी यापुढे नको; संबंधित राज्यसरकारने काळजी घ्यावी’
देशात धार्मिक सण उत्सव काळात मंदिरांमध्ये भाविकांच्या चेंगराचेंगरी प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि संबंधित राजसरकारला चांगलेच धारेवर धरले.
First published on: 19-11-2013 at 04:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temple stampedes supreme court seeks response from centre states