एखाद्या कर्मचाऱ्याविरोधात फौजदारी खटला दाखल झाल्यानंतर त्या आरोपातून त्याची सुटका झाली आणि अशाच प्रकारच्या आरोपप्रकरणी त्याची विभागीय चौकशी सुरू असेल तर तो पुन्हा नोकरी मिळण्यास पात्र ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधात बुधवारी आपला निकाल दिला.
खंडपीठाचे न्या. के. एस. राधाकृष्णन् आणि ए. के. सिकरी यांनी यासंबंधी निकाल देताना ही बाब स्पष्ट केली. संबंधित कर्मचाऱ्यास एखाद्या प्रकरणी फौजदारी न्यायालयाने दोषमुक्त केले आणि त्याच्याविरोधात तसेच आरोप असतील तर तो पुन्हा नोकरी मिळण्यास पात्र ठरणार नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील एका पोलीस कॉन्स्टेबलला कामावरून कमी करण्यात आले होते. फौजदारी न्यायालयाने कर्मचाऱ्यास दोषमुक्त केल्यानंतर शिस्तभंगाची कारवाई सुरू असली तरीही आपल्याला कामावर घेण्यात यावे, तसा आपला हक्क आहे, असा दावा संबंधित कॉन्स्टेबलने केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terminate employee have no right to get job again supreme court
First published on: 05-12-2013 at 12:50 IST