पीटीआय, नवी दिल्ली

एखादा गुन्हा घडला असेल तर त्याच्या तपासासाठी राज्य शासनाच्या यंत्रणेने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मदत करावी, कारण त्यामध्ये कोणतीही हानी नाही असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला सोमवारी दिला.

Supreme Court to hear petitions related to election bonds today
देणग्या ताब्यात घेण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांसंबंधीच्या याचिकांवर आज सुनावणी
Anvyarth Right to Education Act Bombay High Court RTE
अन्वयार्थ: ‘कल्याणकारी’ चेहऱ्यास ‘आरटीई’ने चपराक
Consensual sex cannot be termed rape merely because love wanes away Karnataka High Court
प्रेम कमी झालं म्हणून सहमतीचे शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाहीत : उच्च न्यायालय
स्थानिक स्तरावर कापूस खरेदी केंद्र सुरू करता येतील का? उच्च न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा
vishwambhar chaudhary and lawyer asim sarode
‘संविधान हत्या दिवसा’च्या विरोधात; थेट सरन्यायाधीशांना पत्र… काय आहेत मागण्या?
supreme court, supreme court Clarifies PMLA Arrest Norms, ed can not make arrest on whim, Requires Substantial Evidence, ed, The Enforcement Directorate, supreme court, Prevention of Money Laundering Act, Arvind Kejriwal
लहरीपणाने अटक करता येणार नाही! सर्वोच्च न्यायालयाने ‘ईडी’ला सुनावले
neet paper leak issue
“…तर आम्हाला नीट परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश द्यावे लागतील”, सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान!
medigadda Dam, Damage,
गडचिरोलीतील मेडीगट्टा धरणामुळे शेतजमिनीचे नुकसान, उच्च न्यायालयात याचिका…

‘ईडी’ने तमिळनाडूमधील बेकायदा वाळू उत्खननाच्या प्रकरणाशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी वेल्लोर, तिरुचिरापल्ली, करुर, तंजावर आणि अरियालूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. या समन्सना स्थगिती द्यावी अशी मागणी करत संबंधित अधिकारी आणि राज्य सरकारने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्या समन्सना स्थगिती दिली. ‘ईडी’ने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हेही वाचा >>>‘नारी शक्तीबद्दल बोलता, मग तसं वागा’, कोस्ट गार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

‘ईडी’च्या याचिकेवर मागील आठवडय़ात झालेल्या सुनावणीच्या वेळी, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात याचिका दाखल का केली, जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले तर राज्य सरकार उद्विग्न का झाले?’’ असे प्रश्न राज्य सरकारला विचारले होते.