आपल्या सहज सुंदर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारी श्रीदेवी काळाच्या पडद्याआड गेली आहे. मात्र तिच्या मृत्यूची कुणकुण बिग बी अमिताभ बच्चन यांना लागली होती का? अशी एक चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगते आहे. याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन यांनी केलेला ट्विट.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारण पहाटे २ ते ३ च्या सुमारास श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. मात्र ही बातमी येण्याच्या साधारण ३० ते ३५ मिनिटे आधी अमिताभ बच्चन यांनी, ‘न जाने क्यूँ, एक अजीब घबराहट हो रही है! असा ट्विट केला होता. अमिताभ बच्चन यांना कसली भीती वाटली? श्रीदेवी किंवा आपल्यातून एक सहकलाकार आपल्याला सोडून निघून जाणार आहे याची कुणकुण बिग बींना आधीच लागली होती का? बिग बींनी असा ट्विट का केला? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसते आहे.

अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी ‘खुदा गवाह’ या सिनेमात एकत्र काम केले होते. तसेच श्रीदेवीच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातही अमिताभ बच्चन यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र ट्विटरवर अमिताभ बच्चन यांनी हा ट्विट का केला या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र या ट्विटची चर्चा मात्र रंगली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why amitabh bachchan tweets before sridevis death
First published on: 25-02-2018 at 08:14 IST