Crime News : उत्तर प्रदेशच्या इटवाह येथील एक महिला तिच्या पतीच्या चुलत्याबरोबर पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर ही महिला तिच्या दोन मुलींना देखील बरोबर घेऊन गेली आहे. मुलाला मात्र तिने मागे ठेवलं आहे. यानंतर आता या महिलेचा पती आणि तिच्या सारऱ्याने या महिलेला आणि मुलांना परत घेऊन येणार्यास २० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कुमारा हा टॅक्सी चालक असून तो ३ एप्रिल रोजी कानपूरहून त्याच्या घरी परतला. तेव्हा त्याला कळलं की त्याची पत्नी त्याच्या काकाबरोबर पळून गेली असून तिच्या दोन मुलींना देखील सोबत घेऊन गेली आहे.
“माझी पत्नी नंदरामबरोबर पळून गेली आहे, जो माझ्यासाठी चुलत्याप्रमाणे आहे. तो सतत येत असे आणि यादरम्यान तिच्याशी संबंध निर्माण झाले असावेत. मी मदतीसाठी जिथे जिथे जात आहे तिथे माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,” असे पतीने माध्यमांना सांगितले. व्यक्ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस महिला आणि तिच्या मुलांचा शोध घेत आहेत.
“एक महिन्यापूर्वी, एक महिला तिची मुले आणि तिच्या पतीच्या चुलत्यासह निघून गेली.व्यक्ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपासाच्या आधारे, एफआयआर नोंदवण्यात येत आहे. आम्ही महिलेचा शोध घेऊ,” असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. महिनाभर शोधण्याचे प्रयत्न करूनही महिला आणि मुले यांचा शोध लागलेला नाही.
जितेंद्रचे वडील श्याम किशोर यांनी देखील पोलिसांना त्यांच्या सुनेला शोधण्याची विनंती केली आहे. फक्त माझी नातवंड सुरक्षितपणे घरी यावीत इतकच हवं आहे असे त्यांनी पोलिसांना सांगितले. . “माझ्या मोठ्या मुलाची पत्नी माझ्या धाकटा भाऊ नंदरामबरोबर पळून गेली आहे. तिने एका मुलाला, आमच्या नातवाला, घरी सोडले आहे. संपूर्ण गाव आमची थट्टा करत आहे. आमच्या कुटुंबासाठी हे खूप वेदनादायक आहे,” श्याम किशोर म्हणाले.
“जर सुनेला परत यायचे असेल तर ती येऊ शकते, किंवा ती सोडून जाऊ शकते, परंतु जो कोणी मुलांना परत आणेल त्याला २०,००० रुपये बक्षीस दिले जाईल,” असे त्यांनी पुढे सांगितले.