सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाच्यावेळी फरहान आझमी यांनी हे वक्तव्य केले. सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येचा दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे मुस्लिम समाजामध्ये अस्वस्थतता असल्याचे फरहान आझमी म्हणाले.
आणखी वाचा – ठरलं! उद्धव ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्येत
उद्धव ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नाही असे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले. निवडणुकीआधीच उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला होता. फरहान आझमी जे काही म्हणाले, तो त्यांचा विचार आहे असे सामंत म्हणाले.