Water Metro: भारतात मेट्रो सुविधा सुरू झाल्यापासून अनेकांना ती सोयीची ठरली. जलद प्रवासासाठी रेल्वेने प्रवास करणारे काही प्रवासी मेट्रोकडे वळले. अनेकांना सोयीस्कर असलेल्या मेट्रोचं काम काही ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालंय, तर काही ठिकाणी अजूनही मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे लोकलप्रमाणेच मेट्रोच जाळंदेखील भविष्यात आणखी विस्तारणार आहे.

तुम्ही आतापर्यंत भूमिगत मेट्रोविषयी ऐकलं असेल किंवा अनेकांनी या मेट्रोतून प्रवासही केला असेल. पण तुम्ही वॉटर मेट्रोविषयी कधी ऐकलंय का? कारण भारतातील एका राज्यात अशाप्रकारची वॉटर मेट्रो सेवा सुरू झाली आहे, ज्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही त्याचे तिकिटही बुक करू शकता. म्हणून जर, तुम्ही भारतात वॉटर मेट्रोने प्रवास केला नसेल तर आत्ताच तुमचे तिकिट बुक करा! चला तर मग यानिमित्ताने भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोबद्दल जाणून घेऊ या…

जलमार्गांद्वारे वाहतूक

भारतातील पहिली वॉटर मेट्रो प्रवाशांना जलमार्गाने शहराच्या विविध भागात नेण्यासाठी सुरू करण्यात आली होती. वाहतूक कोंडी कमी करणे आणि सुलभ वाहतुकीला प्रोत्साहन देणे हे या मेट्रोचे उद्दिष्ट आहे.

शहराभोवती कनेक्टिव्हिटी

७५+ किलोमीटरच्या १५ हून अधिक मार्गांवर सेवा देणाऱ्या ७५+ ई-बोट्ससह, हा प्रकल्प शहराभोवती अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतो. पहिली बोट २०२१ मध्ये लाँच करण्यात आली.

भारतातील पहिली वॉटर मेट्रो

केरळमधील कोची हे भारतातील पहिले शहर आहे जिथे पाण्यावर मेट्रो प्रणाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वॉटर बोट्स हायब्रिड पॉवरवर चालतात.

वॉटर मेट्रोची वैशिष्ट्ये

कोची येथील वॉटर मेट्रोने २३ एप्रिल २०२३ रोजी आपले काम सुरू केले. या बोटी पर्यावरणपूरक आहेत कारण त्या बॅटरीवर चालतात, वातानुकूलित आहेत आणि दिव्यांगांसाठी अनुकूल आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिकिटे आणि बुकिंग

जर तुम्ही वॉटर मेट्रोने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कमीत कमी भाड्यात तुमचे तिकिटे ऑनलाइन/ ऑफलाइन बुक करू शकता. या बोटी एकाच वेळी अनेक प्रवाशांना घेऊन जाऊ शकतात यात कॅमेरेदेखील आहेत, ज्यामुळे प्रवास सुरक्षित होतो.