आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. येथे त्यांनी खळा बैठक बोलावून एका नव्या संकल्पनेला सुरुवात केली. कोकणात घराबाहेर असलेल्या अगंणाला खळा म्हणतात. हा खळा म्हणजे कोकणातील घरांचं वैभव. परंतु, कालौघात या खळ्याची रचना, संकल्पना, मांडणी आणि उपयोग यात बदल होत गेला. खळा म्हणजे काय? त्याचा उपयोग काय? शेतीसाठी या खळ्याचा कसा वापर केला जायचा याविषयी आपण जाणून घेऊयात.

ज्या ठिकाणी शेती आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खळा अवश्य दिसेल. केवळ कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर अनेक ग्रामीण भागात आणि शेतीबहुल गावातील घरांसमोर खळा पाहायला मिळतो. काही ठिकाणी खळे शेतात तर काही ठिकाणी घराबाहेर असलेल्या अगंणात असतात. कोकणात खळा घराचा अविभाज्य भाग असला तरी त्याचा वापर मळणीयंत्र म्हणून केला जात असे. शेतातील पिकांपासून धान्याची रास करण्याकरता खळे केले जात असत. कधी हे खळे शेतात असत तर कधी घरासमोर केले जात.

how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
coconut ladu for the prasad
नैवेद्यासाठी बनवा ओल्या नारळाचे लाडू; नोट करा साहित्य आणि कृती
Kalyan, husband hit wife kalyan,
कल्याणमध्ये आवडीचे जेवण करत नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात कढई मारली
Nisargalipi lesson in nature education
निसर्गलिपी – निसर्ग शिक्षणाचा धडा
tendency to experience fear genetics of fear and anxiety disorders
‘भय’भूती : भयाचं पॅकेज!
Dudhache Pedha at home during the festival
सणासुदीला घरीच बनवा ‘दुधाचे पेढे’; नोट करा साहित्य अन् कृती
Makhana's nutritious barfi must be made during the Shravana fast
श्रावणातल्या उपवासात आवर्जून बनवा मखान्याची पौष्टिक बर्फी; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

धान्य मळणी आणि उफणनींसाठी आता यंत्रे आली आहेत. परंतु, पूर्वी शेतात किंवा घरासमोर गोल आकारात खळे तयार केले जात असे. हे खळे शेणामातीने सारवून घेतले जात असे. शेणामातीने सारवलेल्या खळ्यावर धान्य मळणी केली जात असे.

पिकांची कणसे या खळ्यात गोलाकार पसरवली जातात. खळाच्या मध्यभागी लाकूड रोवला जायचा. या लाकडाच्या अवतीभोवती बैल बांधले जायचे. बैलांनी धान्यात तोंड घालू नये म्हणून त्यांच्या तोंडाला मुसक्या बांधल्या जात असत. बैलांना लाकडाभोवती बांधल्यावर ते खळ्यातील कणसावर गोलाकार फिरत. बैल कणसावर फिरू लागल्यानंतर दाणे वेगळे होत.

कोकणात प्रामुख्याने तांदळाचं उत्पादन केलं जातं. भाताची कापणी झाल्यानंतर वाळलेल्या पेंढ्या खळ्यात आणून ठेवल्या जात असत. या भातांची येथेच झोडपणी होत असे. यामुळे भाताच्या ओबींतून साळी मोकळ्या होऊन त्यापासून तांदूळ केला जात असे. परंतु, यासाठीही आता यंत्र आल्याने ही पद्धतही बंद झाली आहे.

खळे झाले दुर्मिळ

पूर्वी शेतीत कष्टाची कामे अधिक होती. मानवी आणि प्राण्यांची अधिक मेहनत असायची. आता शेतीच्या अनेक कामांमध्ये यांत्रिकीकरण आल्याने प्राण्यांचा वापर कमी केला जातो. आता मळणी प्रक्रियेतही यंत्राचा वापर केला जात असल्याने खळ्यांचा वापर कमी झाला आहे. परिणामी खळे आता घरासमोरील अंगण झाले आहेत. कोकणातील प्रत्येक घरासमोर खळा असतोच, फरक इतकाच की आता शेणामातीने सारवलेले खळे दिसत नाही.