उद्धव ठाकरेंनी आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी डोंबिवलीत प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी भरपावसात भाषण केलं. तसंच देशात डिमॉनिटायझेशन ज्या प्रमाणे झालं होतं तसं ४ जूननंतर डी-मोदीनेशन होणार आहे. नरेंद्र मोदी देशात असतील पण ते पंतप्रधान नसतील असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“२०१६ मध्ये मोदींनी काय केलं होतं? चलनी नोटांचं डिमॉनिटायझेशन केलं. तसंच आज मी तुम्हाला सांगतो ४ जूनपासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल , पण देशाचे पंतप्रधान असणार नाही. मी आता नवीन शब्द दिला आहे. ४ जून रोजी देश डीमोदीशन करणार आहे. मला प्रश्न विचारला जातो आहे की मोदींनी २५ सभा घेतल्या. मी म्हटलं घ्या आणखी सभा घ्या. कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत. भाजपाच्या भविष्याची मला चिंता वाटते आहे कारण ४ जूनला यांची सत्ता जाणार. भाजपाचं काय होणार माहीत नाही. पण मोदींना मी विचारु इच्छितो तुम्ही म्हणताय की ७५ वर्षे झाली की राजकारण्यांनी निवृत्त झालं पाहिजे. मग आता तुम्ही काय करणार? दोन वर्षांनी तुम्ही ७५ वर्षांचे होत आहात. तेव्हा भाजपाचं काय होणार? सगळे धोंडे भाजपाच्या पदरात टाकले आहेत.”

Godman Rajneesh was a philosophy lecturer before founding his spiritual movement in Pune.
Osho : “ओशो आश्रमात माझ्यावर तीन वर्षांत ५० वेळा बलात्कार, मला चाईल्ड सेक्स स्लेव्ह…”; महिलेने सांगितली आपबिती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
7-year-old girl was sexually assaulted by two men in Nalasopara
नालासोपार्‍यात ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार
Rape on 10 months girl
10 Months Girl Rape : धक्कादायक! १० महिन्यांच्या मुलीवर बलात्कार, ३० वर्षांचा नराधम अटकेत, कुठे घडली घटना?
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
What Taslima Nasrin Said?
Taslima Nasreen : “दहशतवाद एक दिवसात तयार होत नाही, आधी धर्मांधता जन्म घेते आणि…” तस्लिमा नसरीन यांचं वक्तव्य
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका, “चपराशी झालो तरीही पुन्हा येईन..”

डोंबिवलीकरांना मोदींची भाषा मान्य आहे का?

“मी आज डोंबिवलीकरांशी बोलायला आलो आहे. मोदींची भाषा तुम्हाला मान्य आहे का? मला नकली संतान म्हणत आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? राजकारणात जेव्हा शिवसेना आणि भाजपा अस्पृश्य होते त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. आज त्याच शिवसेनेला नकली म्हटलं जातं आहे हे पटतं आहे का? मला भाजपाचे अनेक लोक म्हणाले की उद्धव ठाकरे हे असं व्हायला नको होतं. भाजपाची जी संस्कारी पिढी होती त्याविषयी मला अजूनही आदर आहे. मोदी एकदा मला नकली सेना म्हणतात, दुसऱ्या दिवशी डोळा मारायचा परत मला नकली संतान म्हणायचं. आत्ताच्या भाजपाला सांगतोय की हे सरकार गजनी सरकार आहे. अशा सरकारला तुम्ही निवडून देणार आहात का? कारण हे उद्या तुम्हालाही विसरतील विचारतील तुम्ही या देशाचे मतदार आहात का? आम्हाला वाटलं की पाकिस्तानचे मतदार आहात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप, “उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचा झेंडा फडकत होता, मतांसाठी…”

देवेंद्र फडणवीसांवर टीका

“देवेंद्र फडणवीस यांना आम्ही काय म्हणतो माहीत आहे. अक्षय कुमारला मी सांगणार आहे की मोदींची ४ जूनच्या आत परत एक मुलाखत त्याने घ्यावी आणि टरबूज कसं खातात मोदी ते विचारावं, पण हे ४ जूनच्या आत करावं. कारण ४ जून नंतर टरबुजाचा भाव उतरणार आहे. त्यांचं कसं चाललं आहे चपराशी झालो तरीही पुन्हा येईन. आपले मिंधे त्यांच्या मागे दाढी खाजवत फिरत आहेत. दाढी खाजवणारे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार, महाराष्ट्र तुमच्या डोळ्यांदेखत लुटला जातो आहे तरीही मिंधे दिल्लीची चाकरी करत आहेत. हे काय बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार? आमच्या छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली होती. त्या सूरतेचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत हे मिंधे पाहात आहेत. तरीही तुम्ही शांतपणे पाहताय हे बाळासाहेबांचे विचार?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.