सध्या जगभरात कृत्रिम बुद्धीमत्तेची (AI) जोरदार चर्चा सुरु आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये नवनव्या सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेन्स (AGI)च्या विकासासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे. ते ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अत्युच्च विकास म्हणून एजीआयकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

एजीआय म्हणजे काय?

एजीआयमुळे एखाद्या मनुष्याला करता येईल असे कोणतेही काम मशीन अथवा सॉफ्टवेअरलाही करता येईल. त्यामध्ये तर्कवितर्क, सामान्य ज्ञान, कार्यकारणभाव इत्यादी मानवी कौशल्यांचा समावेश असेल. अगदीच सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, एजीआयमुळे मशीनला मानवी बुद्धीप्रमाणेच काम करता येईल. मशीनदेखील माहीत नसलेल्या गोष्टी नव्याने शिकणे, नव्या अनुभवांमधून शिकणे आणि प्राप्त केलेली माहिती वापरात आणण्यासारख्या अनेक गोष्टी मानवाप्रमाणेच शिकू शकेल.

Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
kutuhal
कुतूहल: प्रगत हयूमनॉइड
Sheikh Hasina head of state in Bangladesh in the Indian subcontinent has always faced conflict
उठाव, बंड, हत्या… भारतीय उपखंडातील महिला राष्ट्रप्रमुखांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष?
loksatta analysis wayanad disaster in light of gadgill commission report
पश्चिम घाट पर्यावरण संवर्धनासंदर्भात माधव गाडगीळ समिती अहवाल काय आहे? अहवालाकडे दुर्लक्षामुळेच वायनाडमध्ये प्रलय? 
loksatta kutuhal robots in the manufacturing industry
कुतूहल : औद्योगिक यंत्रमानव
Why is it necessary to overcome the aversion to maggots for medicinal benefits
अळ्यांबाबतचा तिटकारा दूर करण्यासाठी ‘Love a Maggot’ ही मोहीम का राबवावी लागत आहे?
Budget 2024 and History
२०२४ च्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गीयांवर कराचा भार वाढला; यासंदर्भात मध्ययुगीन भारतीय इतिहास काय सांगतो?

हेही वाचा : विश्लेषण: विवाह संस्कार आणि सप्तपदी अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! हिंदू धर्मात किती प्रकारचे संस्कार महत्त्वाचे मानले गेले आहेत?

मनुष्य त्याच्या अनुभवांमधून विविध गोष्टी शिकतो. घर, शाळा वा इतर ठिकाणांमधून त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करून वा लोकांशी संवाद साधून वा पुस्तके, टीव्ही अशा माध्यमांतूनही त्याची जडणघडण होते आणि त्याच्या मेंदूचा विकास होतो. त्यानंतर मनुष्याचा मेंदू विविध अडचणींवर मार्ग काढण्यासाठी या सगळ्या अनुभवांतून प्राप्त झालेल्या माहितीचा वापर करतो.

एजीआयमुळे एखादे सॉफ्टवेअर अथवा मशीनदेखील अगदी हीच क्षमता प्राप्त करू शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा एवढा विकास प्रत्यक्षात आणण्याचे संशोधकांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मानवी मेंदू ज्याप्रमाणे काम करतो अगदी तसेच काम एजीआयमुळे मशीनलाही करता येऊ शकेल, या दृष्टीने संशोधक काम करीत आहेत. म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्तेचा यंत्रमानव अगदी माणसासारखाच तुमचा मित्र असेल. तो तुम्हाला काय म्हणायचे आहे ते अगदी सहजपणे समजून घेऊ शकेल, नव्या गोष्टी शिकू शकेल आणि एखाद्या समस्येवर त्याच्या बुद्धिमत्तेने उपायही काढू शकेल.

एआय आणि एजीआयमध्ये काय फरक आहे?

एआय (AI) आणि एजीआय (AGI) यामध्ये नक्कीच फरक आहे. मुख्य फरक आहे व्याप्ती आणि क्षमतेचा! एआय एखादी विशिष्ट कृती करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकेल. उदाहरणार्थ- चित्र ओळखणे, त्यावर प्रक्रिया करणे, भाषांतर करणे वा तुमच्याबरोबर बुद्धिबळासारखा खेळ खेळणे. एआयकडून ही सगळी कामे मानवापेक्षा जलद आणि अचूक गतीने केली जात असली तरीही त्याची क्षमता तेवढ्या एखाद्या कृतीपुरतीच मर्यादित राहते. दुसऱ्या बाजूला एजीआय एखाद्या कृतीपुरते मर्यादित नाही. त्याची क्षमता आणि व्याप्ती एआयपेक्षा अधिक मोठी असेल. ते अगदी मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे अचूकपणे एकाच वेळी अनेक कामे करू शकेल.

त्यामुळेच एजीआयबाबतच्या घडामोडींकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाचे अत्युच्च शिखर म्हणून पाहिले जात आहे. संशोधकांकडून एआयच्या क्षमतांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न आधीपासूनच केले जात आहेत. म्हणूनच नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटीसारखे एआय माध्यम बाजारात आल्याबरोबर अल्पावधीतच इतके लोकप्रिय झाल्याचे दिसून आले. ते अगदी मानवी बुद्धिमत्तेप्रमाणेच मजकुरावर प्रक्रिया करू शकते, हेच त्यामागचे कारण आहे.

तेव्हापासून एआय हा विषय अधिक प्रमाणात चर्चेला आला. सध्या त्यामधील संशोधनाला अधिकाधिक गती देण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात असल्यामुळे आता दिवसेंदिवस एआयची माध्यमे अधिकाधिक विकसित होत आहेत. एजीआय हे याच एआय विकासाचे अत्युच्च शिखर ठरेल, यात शंका नाही.

ही पूर्णपणे नवी कल्पना आहे का?

नाही. ही पूर्णपणे नवी कल्पना आहे, असे म्हणता येणार नाही. २० व्या शतकात पहिल्यांदा एजीआयची संकल्पना मांडण्यात आली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानल्या जाणाऱ्या ॲलन ट्युरिंग यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये सर्वप्रथम ही संकल्पना मांडली होती. त्यांनी ‘कॉम्प्युटिंग मशिनरी अॅण्ड इंटेलिजेन्स’ (१९५०) या शोधनिबंधामध्ये यंत्रांची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी ‘ट्युरिंग टेस्ट’ नावाची नवी संकल्पना मांडली होती. ट्युरिंग टेस्टनुसार एखादे मशीन जर माणसाबरोबर माणसाप्रमाणेच संवाद साधू शकत असेल, तर ते मानवी बुद्धिमत्तेचेच प्रदर्शन करीत असल्याचे द्योतक आहे, असे सांगण्यात आले होते.

ट्युरिंग यांनी हा शोधनिबंध लिहिला तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास अजिबात झालेला नव्हता. इतकेच काय, संगणकही त्याच्या प्राथमिक अवस्थेत होता. मात्र, ट्युरिंग यांनी ही संकल्पना मांडल्यामुळे अशा प्रकारच्या यंत्रांच्या अस्तित्वाबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली होती. मानवी बुद्धिमत्तेची क्षमता असणाऱ्या अशा यंत्रांच्या फायद्या-तोट्यांवरही चर्चा होऊ लागल्या.

एजीआयचा मानवासाठी काय फायदा होऊ शकतो?

तात्त्विकदृष्ट्या एजीआयचे असंख्य सकारात्मक फायदे सांगता येऊ शकतात. उदाहरणार्थ- आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एजीआयचा वापर केल्यास कमी कालावधीमध्ये अचूक पद्धतीने रोगाचे निदान, उपचाराची पद्धती आणि रुग्णपरत्वे औषधोपचारही निश्चित करता येऊ शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या माहितीच्या विस्तृत साठ्याचे कमी कालावधीत विश्लेषण करून निर्णय घेणे ही मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे. मात्र, एजीआयमुळे हे वास्तवात येऊ शकते. अगदी अर्थकारणात आणि व्यवसायांमध्येही एजीआयचा वापर प्रभावीपणे केला जाऊ शकतो. एजीआयद्वारे सद्य:स्थितीतील बाजाराचे अचूक विश्लेषण करून अंदाज वर्तविण्याचे कामही सहजतेने होऊ शकते. शिक्षण क्षेत्राचे उदाहरण घेतल्यास, एजीआयमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनोख्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात. प्रत्येकाची क्षमता ओळखून, त्याच्या गरजेनुसार त्याला शिक्षण देण्याची व्यवस्था अस्तित्वात आणता येऊ शकते.

हेही वाचा : विश्लेषण : जगातील ४६ टक्के दमा मृत्यू भारतात… दम्याच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय आवश्यक?

एजीआयबाबत संशयाचे वातावरण का?

एकीकडे एजीआयचे इतके फायदे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र त्याबाबत भीतीही व्यक्त केली जात आहे. एजीआय प्रणाली विकसित करण्यासाठी होणारा उर्जेचा वापर आणि ई-कचऱ्याच्या निर्मितीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम हा चिंतेता विषय आहे. एजीआयमुळे रोजगारामध्येही मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते; तसेच सामाजिक आणि आर्थिक विषमतेमध्येही प्रचंड वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे ज्यांच्या हातात एजीआयचे नियंत्रण असेल त्यांच्या हातात इतरांपेक्षा अधिक अधिकार येऊ शकतात. असे झाल्यास, त्यामुळे नव्या प्रकारच्या समस्या आणि व्यवस्था उदयाला येऊ शकते; ज्याची आपण कल्पनाही केलेली नसेल. जर मनुष्य एजीआय तंत्रज्ञानावर अधिकाधिक विसंबून राहू लागला, तर तो आपल्या मूलभूत मानवी क्षमता आणि कौशल्येही गमावून बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

एजीआय मानवी क्षमतेला ओलांडून त्याच्याही पुढे जाऊ शकते, हाच एजीआयबाबतचा सर्वांत मोठा धोका आहे. असे झाल्यास, मानवाला एजीआयच्या संभाव्य कृती समजून घेणे आणि त्यांचा अंदाज वर्तविणेही कठीण होऊ शकते. अनेक साय-फाय चित्रपटांमध्ये मानवाचे यंत्रमानवांवरील नियंत्रण सुटून, ते अधिक शक्तिशाली झाल्याचे चित्रण केले गेले आहे. चित्रपटांमध्ये असे यंत्रमानव मानवी कल्याणाच्या विरोधात जाताना दिसतात. अगदी तसेच काहीसे येणाऱ्या भविष्यात वास्तवात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीबीसीला २०१४ मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये दिवंगत प्राध्यापक स्टीफन हॉकिंग म्हणाले होते, “कृत्रिम बुद्धिमत्तेचा संपूर्ण विकास झाला, तर मानवजातीचा अंतही होऊ शकतो.” त्यामुळेच एजीआयचा विकास हा मानवी मूल्यांशी सुसंगत आणि मानवाच्या सुरक्षिततेला धरूनच व्हायला हवा. त्यासाठी अनेक विचारवंत मांडणी करताना दिसतात.