गेल्या दीड वर्षाच्या काळात भारताच्या पूर्वेकडे एकापाठोपाठ आलेल्या तीन चक्रीवादळांमुळे त्याचा स्थानिक जनजीवनावर मोठा परिणाम झाला. जवद, गुलाब आणि नुकतंच पूर्व किनारपट्टीवर आलेल्या असनी चक्रीवादळामुळे स्थानिक जनजीवनावर मोठा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व्यवस्थेवर ताण पडू लागला असताना बंगालच्या उपसागरात इतकी चक्रीवादळं का निर्माण होतात? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जगभरात उठलेल्या १० अतीभयंकर चक्रीवादळांपैकी ८ चक्रीवादळं ही बंगालच्या उपसागरात निर्माण झाली आहेत.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

गेल्या दोन दिवसांपासून पूर्व किनारपट्टीच्या दिशेनं येत असलेलं असनी चक्रीवादळ बऱ्याच अंशी कमकुवत झालं आहे. मात्र त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे वळले असल्याने या राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पण चक्रीवादळांचा इतिहास असलेल्या या भूभागासाठी आता चक्रीवादळ हा प्रकारच फारसा नवीन राहिला नसल्याचंच आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asani cyclone on east coastal area reason behind worst environment condition pmw
First published on: 13-05-2022 at 17:32 IST