नविन वर्षात राज्यात मुंबई ते नवी मुंबई पर्यंतचा प्रवास आता १५ मिनिटांमध्ये होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२२ पासून सुरू होणार्‍या बहुप्रतिक्षित मुंबई वॉटर टॅक्सी सेवा फेरीमुळे बेलापूर आणि नेरूळ येथील टर्मिनल्स दरम्यान प्रवास करता येण्याची अपेक्षा आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ते नवी मुंबई या बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन करतील, असे अधिकृत सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई जलवाहतूक प्रकल्पाचे नवीन मार्ग कोणते आहेत?

सरकारने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (डीसीटी) ते रेवस, करंजाडे, धरमतर, डीसीटी ते बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली, खांदेरी बेटे आणि जेएनपीटी असे मार्ग विविध वाहतूक करणाऱ्यांना दिले आहेत. वाहतूक करणाऱ्यांचे म्हणणे आहे की डीसीटी ते जेएनपीटी आणि नंतर नवी मुंबई हा सर्वात जास्त मागणी असलेला मार्ग असेल. सध्या वाशी आणि ऐरोली येथे पायाभूत सुविधा नाहीत.

नवीन वॉटर टॅक्सी मार्ग कधी सुरू होतील?

मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सध्या तीन ऑपरेटर तयार आहेत. पुढील दोन-तीन महिन्यांत त्यांचे कॅटमरान योग्य असल्याचे प्रमाणित झाल्यानंतर चौथा ऑपरेट सामील होऊ शकेल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वॉटर टॅक्सी आणि कॅटमरान टर्मिनलचे काम कधी सुरू झाले?

नितीन गडकरी जहाजबांधणी मंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला. मुंबई पोर्ट ट्रस्टने डीसीटी बांधली आणि सिडकोने नवी मुंबईत टर्मिनल बांधण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मार्ग निश्चित केले. एमबीपीटीने खांदेरी बेटांवर काँक्रीटची जेट्टी बांधली.

भाडे किती असेल?

अधिकाऱ्यांना असे वाटते की सध्या भाडे जास्त आहे आणि ऑपरेटरला मोठे कॅटमरान मिळाल्यावर दर कमी करता येतील. एका ऑपरेटरने सांगितले की डीसीटी ते नवी मुंबईचे भाडे प्रति प्रवासी १,२०० ते १,५०० रुपये असेल तर जेएनपीटीचे भाडे सुमारे ७५० रुपये असू शकते. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की,  मुंबईतील डीसीटी ते जेएनपीटी आणि नवी मुंबईचे भाडे ८०० ते १,१०० रुपये असेल.

वॉटर टॅक्सीला नवी मुंबईला जाण्यासाठी किती वेळ लागेल?

ऑपरेटर्सच्या म्हणण्यानुसार, डीसीटी ते नवी मुंबई ही ३० मिनिटांची फेरी असेल आणि डीसीटी ते जेएनपीटी १५ ते २० मिनिटांची असेल. एमबीपीटी आणि एमएमबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्षातून ३०० ते ३३० दिवस ही सेवा चालू शकते पण अतिवृष्टीमध्ये त्या चालणार नाहीत. सकाळी आणि संध्याकाळी यामध्ये वारंवारता जास्त असणे अपेक्षित आहे.

मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावर जलवाहतूक विकसित करण्याच्या प्रकल्पाचे हात आणि एमएसआरडीसीसारख्या अनेक सरकारी संस्था बदलल्या आहेत. सध्या एमएमबी काही ठिकाणी जेटी बांधत आहे, मात्र गेल्या दोन दशकांत फारशी प्रगती झालेली नाही.

मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान शेवटची सागरी वाहतूक कधी झाली?

१९९४ मध्ये सेवा बंद होईपर्यंत गेटवे ऑफ इंडिया नवी मुंबईशी जोडलेले होते आणि गिरगाव जुहूशी कॅटामरनने जोडलेले होते. सध्या मुंबई-मांडवा मार्गावर स्पीडबोटी, लाँच, कॅटमॅरन आणि मुंबईला उरण, मोरा, रेवस, मांडवा आणि एलिफंटा लेणींशी जोडणाऱ्या लाँच आहेत. याशिवाय, मढ बेट आणि वर्सोवा, बोरिवली आणि गोराई-एस्सेलवर्ल्ड आणि मार्वे-मनोरी यांना जोडणाऱ्या डिझेल लाँच आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained mumbai dct belapur nerul navi mumbai water taxi abn
First published on: 23-12-2021 at 17:54 IST