मागील वर्षांच्या तुलनेत यंदा देशातील अन्नधान्याचं एकंदरित उत्पादन वाढलं असलं तरी तांदळाचं उत्पादन मात्र कमी झालं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पावसाचं प्रमाण कमी होणं हे यामागील मुख्य कारण आहे. मात्र मोठ्या क्षेत्रावर करण्यात आलेली तांदळाची लागवड पाहता तांदळाच्या टंचाईची चिंता करण्याची गरज नाहीय. तांदळाच्या उत्पादनासंदर्भातील आकडेवारी आणि सध्याची स्थिती काय आहे यावर आपण या लेखामधून नजर टाकणार आहोत.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसामुळे यंदा खरीपाच्या हंगामामध्ये अधिक क्षेत्र ओलिताखाली आलं. ओलिताखालील क्षेत्राचं प्रमाण हे मागील वर्षी याच जून ते जुलै मध्यापर्यंतच्या कालावधीतील ओलिताच्या क्षेत्रापेक्षा अधिक आहे. मात्र तांदळाची शेती असणारं क्षेत्र या वर्षी १२८.५० लाख हेक्टर इतकं आहे. १५ जुलैपर्यंतची ही आकडेवारी आहे. मागील वर्षीच्या १५५.५३ लाख हेक्टरपेक्षा ही आकडेवारी १७.४ टक्क्यांनी कमी आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is there a crisis in rice scsg
First published on: 20-07-2022 at 19:41 IST