राहुल गांधी यांनी होशियारपूर या ठिकाणी वरूण गांधी यांच्याविषयी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की वरूण गांधी हा माझा भाऊ आहे, मात्र आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत. मी कधीही संघ मुख्यालयात जाऊ शकत नाही, माझा गळा चिरला तरीही मी जाणार नाही. असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. तसंच वरूण गांधी हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे चर्चा सुरू झाली ती मनेका गांधी यांचीही. गांधी घराण्यापासून मनेका गांधी यांनी फारकत घेतली होती. इंदिरा गांधी यांचं निवासस्थान दोन वर्षांच्या वरूणला सोबत घेत अर्ध्या रात्री सोडलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गांधी घराणं हे देशातलं सर्वात राजकीय वारसा लाभलेलं घराणं

गांधी घराणं हे देशातलं सर्वात मोठा राजकीय वारसा लाभलेलं घराणं आहे. काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाचे हे सगळे सदस्य. इंदिरा गांधी या आपल्या देशाच्या पंतप्रधानही होत्या. त्यांच्यानंतर राजीव गांधी हेदेखील स्पष्ट बहुमत मिळवत देशाचे पंतप्रधान झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी या तिघांनीही काँग्रेस पक्षावर चांगली पकड बसवली आहे. हायकमांड संस्कृती देशात कशी रुजवली गेली हे आपण पाहिलंच आहे. मात्र त्याचवेळी गांधी कुटुंबाचे दोन सदस्य हे भाजपाचे खासदार आहेत. होय बरोबर आम्ही बोलत आहोत ते मनेका गांधी आणि वरूण गांधी यांच्याविषयीच. या दोघांनी खूप पूर्वीच गांधी घराणं सोडलं. भाजपाची विचारसरणी त्यांनी अंगिकारली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened that night when maneka gandhi left gandhi family with two years old son varun gandhi scj
First published on: 18-01-2023 at 21:41 IST