“केसांना आंघोळीनंतर घराबाहेर पडण्यापूर्वी तेल लावावे का?” या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे देणार्‍यांकडून सर्वसाधारणपणे हा मुद्दा मांडला जातो की,केसांना तेल लावून घराबाहेर पडल्यानंतर बाहेरच्या वातावरणातील धूळ-धूर-प्रदूषक घटक,वगैरे कचरा केसांना चिकटण्याचा धोका असतो.ज्यामुळे केसांच्या मुळांशी कचरा जमून मुळं सैल होऊन केसांचे आरोग्य खराब होऊ शकते. मात्र हा मुद्दा एकांगी वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याची दुसरी बाजू बघू. केसांना लावले जाणारे तेल हे एक प्रकारचे आच्छादक आवरण तयार करते,जे वातावरणातील धूळ-धूर,कचरा वगैरे घटकांना केसांच्या मुळांशी जाण्यापासुन रोखते.एकंदरच केसांना लावले जाणारे तेल हे एकीकडे केसांना आवश्यक असणारे पोषण देऊन, मुळांना अधिक घट्ट करुन,तिथल्या त्वचेला कोरडी पडू न देता, कोंड्याला प्रतिबंध करुन आणि दुसरीकडे बाह्य घटकांपासून संरक्षण करुन केसांना निरोगी राहण्यास साहाय्य करते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy living health tips in marathi is hair oil necessary for better hair health
First published on: 21-03-2017 at 11:31 IST