आयपीलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या पहिल्याच सामन्याने जागतिक विक्रम केला आहे. २० कोटी लोक एकाच वेळी हा सामना पाहत होते. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. १९ सप्टेंबरला झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला होता. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. "आयपीएलच्या पहिल्या सामन्याने नवा रेकॉर्ड केला आहे. BARC नुसार, अभूतपूर्व प्रतिसादासोबत २० कोटी लोकांनी सामना पाहिला. कोणत्याही देशातील स्पोर्टिंग लीगला इतक्या प्रमाणात दर्शक मिळालेले नाहीत. कोणत्याही लीगला सुरुवातीलाच इतका मोठा प्रतिसाद मिळालेला नाही," असं ते म्हणाले आहेत. Opening match of #Dream11IPL sets a new record! As per BARC, an unprecedented 20crore people tuned in to watch the match. Highest ever opening day viewership for any sporting league in any country- no league has ever opened as big as this. @IPL @SGanguly99 @UShanx @DisneyPlusHS — Jay Shah (@JayShah) September 22, 2020 महेंद्रसिंग धोनीने मुंबईला सलामीच्या सामन्यात पराभूत करून इतिहास रचला. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना हा धोनीचा १००वा विजय ठरला. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना १०० विजय मिळवणारा धोनी IPL इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीने IPLमध्ये कर्णधार म्हणून एकूण १०५ विजय मिळवले आहेत, पण त्यातील ५ विजय त्याने पुणे वॉरियर्स संघासाठी मिळवले होते. असा रंगला पहिला सामना- मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील ३१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हार्दिक पांड्या (१४), कृणाल पांड्या (३) आणि कायरन पोलार्ड (१८) यांनी निराशा केली. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. दोन गडी स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. रायडूने ७१ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यावर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.