कोल्हापूर: प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी १४४ आमदारांची पूर्तता हवी. ती झाली कि वानखेडे वा ब्रेबॉन कोणत्याही स्टेडियम मध्ये शपथ घेता येते, असा तिरकस टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना येथे लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी  वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे विधान केले होते त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुस्लिम कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

What Devendra Fadnavis Said About Sharad Pawar?
“शरद पवार हे अजित पवारांना व्हिलन बनवत होते, डावलत होते कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा
Will Uddhav Thackeray be taken with BJP Chief Minister Eknath Shinde reply pune
उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
Devendra Fadnavis claimed that Sharad Pawar and Uddhav Thackeray will merge with Congress
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा; म्हणाले, चार जूननंतर शरद पवार, उद्धव ठाकरे…
Uddhav Thackeray and Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “दाढीवाल्यांच्या नादी…”
devendra fadnavis challenges uddhav thackeray over vijay wadettiwars controversial remarks
वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Thanks to Narendra Modi and Amit Shah for giving Shiv Sena and dhanushyaban says Chief Minister Eknath Shinde
शिवसेना आणि धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी, शाह यांचे आभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde, Modi, Eknath Shinde latest news,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी को हराना मुश्कीलही नही…
Uddhav Thackeray And Modi
देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची फोनवरुन चौकशी करायचे, कारण..”

हेही वाचा >>> कोल्हापुरात मनसेने इंग्रजी फलकांना काळे फासले

बीआरएसचा महाराष्ट्र धोका संपला

बीआरएसचे नेते के. चंद्रशेखरराव पंढरपूरला शेकडो, गाड्या हजारो कार्यकर्ते घेऊन आले तेव्हा आम्ही पण घाबरलो होतो. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य होण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, आंदोलन वाखण्यासारखी होते. दहा वर्षाच्या कारभारात त्यांनी रयतू शेतकरी सारख्या योजना राबवून सातत्याने जाहिरातबाजी केली होती. अलीकडचे जमिनी वास्तव वेगळे होते हे निकालातून दिसले आहे. महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीमध्ये बीआरएसचे काही चालेल असे वाटत नाही, अशी टिका त्यांनी केली.

हेही वाचा >>> आजरा कारखान्याच्या निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ – सतेज पाटील या मित्रांमध्येच मुकाबला

भारत यात्रा अपयशी

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक परिणाम झाला नाही हे चार राज्यांच्या हे विधानसभा निवडणूक निकालावरून सिद्ध झाले आहे, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगीतले.

विधानसभा निकालांचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही असे विधान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यावर मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांचे लोकांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी अशी विधाने करावी लागतात.

ईव्हीएमची शुद्धता सिद्ध

ईव्हीएम बाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रारी झाल्या असता त्यांनी निर्वाळा दिला आहे. ईव्हीएम हे सिद्ध झालेले तंत्रज्ञान आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय आणि एमआयएमच्या सर्व सात जागांवर विजयी उमेदवार विजयी होणे हा याचाच भाग आहे. त्यामुळे ईव्हीएम बाबत विरोधकांनी शंका उपस्थित करणे गैर आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.