कोल्हापूर : नागपूर – गोवा या शक्तिपीठ महामार्गाने हजारो एकर पिकाऊ जमीन उद्ध्वस्त होणार असल्याची भीती या मार्गावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे याबाबत आंदोलन सुरू आहे. याची दखल घेऊन आता २६ मार्च ( मंगळवारी) याबाबत कोल्हापुरात जनसुनावणीचे आयोजन केले आहे.

शक्तिपीठ महामार्गातील पट्ट्यात मुख्यतः अल्पभूधारक शेतकरी शेती कसतात. भूमि अधिग्रहणामुळे हजारो शेतकरी भूमिहीन आणि अति अल्पभूधारक होणार आहेत. पर्यावरणाचे भयानक नुकसान होऊन आधीच पूरग्रस्त असलेल्या भागाला सतत धोका निर्माण होणार आहे. शेतकरी आणि बाधित लोक शासनाकडे हरकती दाखल करत आहेत.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

हेही वाचा : शहीद दिनानिमित्त शाहू महाराजांचे अभिवादन

शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीने या महामार्गाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक त्रिसदस्यीय तज्ञ समिती स्थापन केली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार आणि रयत शिक्षण संस्थेमधील निवृत्त प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील हे सदस्य आहेत.

हेही वाचा : शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजेंची वडिलांसाठी खास पोस्ट

या समितीसमोर महामार्गाविषयी कैफियत सादर करण्यासाठी मंगळवार, २६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात ही जनसुनावणी होईल. तरी सर्व बाधित शेतकरी, शेतकरी संघटना, पर्यावरणाचे अभ्यासक आणि नागरिकांनी आपली मते या समितीसमोर मांडावीत, असे आवाहन करत आहोत. संबंधितांनी आपले मत लेखी स्वरूपात सादर केल्यास सत्य स्थिती समजण्यास मदत होईल, असे डॉ. उदय नारकर यांनी सांगितले.