कोल्हापूर : सलग दहा दिवसांच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली आहे. बाधित पिकांचे पंचनामे करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यात ५८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
जिल्ह्यात सलग दहा दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत. तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अंतिम अहवाल जिल्हा कार्यालयास ३१ मे पूर्वी सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल अधिकाऱ्यांना दिल्या होता. या पिकांचे नुकसानमुसळधार पावसामुळे भुईमूग, भात, सूर्यफूल, केळी, आंबा, भाजीपाल, मका, कलिंगड, नाचणी आदी पिकांचे नुकसान झाले असल्याचे आजच्या पंचनामांमध्ये दिसून आले.
२२२ गावांना फटका
जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक १५३, पाठोपाठ पन्हाळा १२९ व करवीर तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २२२ गावातील २८४७ शेतकऱ्यांचे ५८० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे, असे कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी सांगितले.