कोल्हापूर : आजचा काळ प्रगत वैद्यकीय सेवेचा म्हणून ओळखला जात असला तरी आजही खेडोपाड्यात जुन्या प्रथा, परंपरा याचे आचरण केले जाते. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे ‘मरीआईचा गाडा’. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात गेली १२४ वर्षे ही प्रथा पाळली जात आहे.

जरीआई – मरीआई या देवतांना ग्रामीण भागात आजही महत्व आहे. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ या नावाने महाराष्ट्रात पूजिली जाते.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
Pedestrian bridge unused due to inconvenience Municipal Corporation neglects maintenance
‘पाऊल’ अडते कुठे? असुविधांमुळे पादचारी पूल वापराविना; देखभालीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
Technology and Urbanization Human Progress
तंत्रकारण: तंत्रज्ञान आणि नागरीकरण

हेही वाचा – कोल्हापूर : चंद्राबाबू नायडू सपत्निक महालक्ष्मीच्या चरणी, मोदींचे सरकार येण्याचा विश्वास

१९ वे शतक सुरु होत असताना कोल्हापुरात आलेल्या महाभयानक प्लेग रोगाने गावात प्रवेश करू नये यासाठी तेव्हापासून आजपर्यंत पन्हाळा तालुक्यात ‘मरीआईचा गाडा’ ओढला जातो. मान्सूनला सुरुवात होण्याआधी गावातील नागरिक एकत्र येऊन मरीआईची पूजा करतात. श्रीफळ, नारळ, साखर, आंबील, घुगऱ्याचा नैवेद्य दाखवून हलगीच्या तालावर तो गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये सोडून दिला जातो. दुसऱ्या गावातून तो गाडा पुढे-पुढे जात शेवटी तो जंगलात सोडून दिला जातो.

हेही वाचा – कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे सांडपाणी प्रक्रियेविना पंचगंगेत; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहिती

आजही आबालवृद्ध या परंपरेत सहभागी होतात, गावाला रोगराईपासून दूर ठेवावे ही यामागची श्रद्धा आहे, असे ज्येष्ठ नागरिक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

Story img Loader