कोल्हापूर : आजचा काळ प्रगत वैद्यकीय सेवेचा म्हणून ओळखला जात असला तरी आजही खेडोपाड्यात जुन्या प्रथा, परंपरा याचे आचरण केले जाते. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे ‘मरीआईचा गाडा’. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात गेली १२४ वर्षे ही प्रथा पाळली जात आहे.

जरीआई – मरीआई या देवतांना ग्रामीण भागात आजही महत्व आहे. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ या नावाने महाराष्ट्रात पूजिली जाते.

Shahala masks, Uran, Navratri festival, loksatta news,
नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Soyabean crop in danger due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”
Mumbai political hoardings ganeshotsav 2024
मुंबई: राजकीय फलकबाजी; गणेशोत्सव काळात न्यायालयाच्या आदेशांचा विसर
Ganesh utsav, Manmad-Kurla Godavari Express,
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार
Lalbagh Ganesh utsav Mandal, Lalbagh Ganesh,
पहिल्याच दिवशी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान

हेही वाचा – कोल्हापूर : चंद्राबाबू नायडू सपत्निक महालक्ष्मीच्या चरणी, मोदींचे सरकार येण्याचा विश्वास

१९ वे शतक सुरु होत असताना कोल्हापुरात आलेल्या महाभयानक प्लेग रोगाने गावात प्रवेश करू नये यासाठी तेव्हापासून आजपर्यंत पन्हाळा तालुक्यात ‘मरीआईचा गाडा’ ओढला जातो. मान्सूनला सुरुवात होण्याआधी गावातील नागरिक एकत्र येऊन मरीआईची पूजा करतात. श्रीफळ, नारळ, साखर, आंबील, घुगऱ्याचा नैवेद्य दाखवून हलगीच्या तालावर तो गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये सोडून दिला जातो. दुसऱ्या गावातून तो गाडा पुढे-पुढे जात शेवटी तो जंगलात सोडून दिला जातो.

हेही वाचा – कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे सांडपाणी प्रक्रियेविना पंचगंगेत; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहिती

आजही आबालवृद्ध या परंपरेत सहभागी होतात, गावाला रोगराईपासून दूर ठेवावे ही यामागची श्रद्धा आहे, असे ज्येष्ठ नागरिक पी. आर. पाटील यांनी सांगितले.