T20 World Cup IND vs SL : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत भारताने श्रीलंकेच्या संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू (३३) आणि दिलहारी (नाबाद २५) यांच्या खेळीमुळे श्रीलंकेने २० षटकात भारताला ११४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्माने धडाकेबाज ४७ धावांची खेळी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात अव्वल स्थान कायम राखले. चार बळी मिळवणाऱ्या राधा यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. games wins A perfect group-stage performance from India #T20WorldCup | #INDvSL pic.twitter.com/jQWJQxk89L — T20 World Cup (@T20WorldCup) February 29, 2020 ११४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना हिने दमदार सुरूवात केली होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात स्मृती माघारी परतली. तिने ३ चौकारांसह १२ चेंडूत १७ धावा केल्या. फॉर्मशी झगडत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत पुन्हा अपयशी ठरली. १५ धावांची खेळी केल्यावर ती उंच फचका मारून झेलबाद झाली. शफाली वर्मा दमदार खेळी करत असताना तिला धावबाद व्हावे लागले. गेल्या सामन्यात ४६ धावांवर बाद झालेली शफाली आज ४७ धावांवर बाद झाली आणि पुन्हा तिचे अर्धशतक हुकले. त्यानंतर रॉड्रीग्ज (१५*) आणि दिप्ती शर्मा (१५*) यांनी भारताला विजय मिळवून दिला. India top Group A! An excellent performance sees them beat Sri Lanka by seven wickets with 33 balls remaining a href="https://twitter.com/hashtag/T20WorldCup?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#T20WorldCup | #INDvSL pic.twitter.com/kkxjs7KvpM — T20 World Cup (@T20WorldCup) February 29, 2020 सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकला. दिप्ती शर्माने उमेशा थिमासीनीला दोन धावांवर बाद केलं आणि भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चांगली भागीदारी होत असतानाच १७ चेंडूत १२ धावा करणारी हर्षिता माधवी त्रिफळाचीत झाली. राजेश्वरी गायकवाडने तिला माघारी धाडले. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने चांगली सुरूवात करत ३३ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, पण मोठा फटका मारताना ती झेलबाद झाली. अटापटू बाद झाल्यावर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. हसीनी परेरा (७), करूणरत्ने (७), सिरीवर्धने (१३), अनुष्का संजीवनी (१) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे शंभरीच्या आत श्रीलंकेचे सात गडी माघारी परतले होते. निलाक्षी डी सिल्वा आणि दिलहारी यांनी काही काळ खेळपट्टीवर तग धरला, पण अखेर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात सिल्वा (८) माघारी परतली. अखेरच्या टप्प्यात दिलहारीने नाबाद २५ धावा करून श्रीलंकेला ११३ धावांपर्यंत पोहोचवले. राधा यादवने ४, राजेश्वरी गायकवाडने २ तर शिखा, पूनम आणि दिप्तीने १-१ बळी टिपला.