सामन्यात दोन वेळा आघाडी घेऊनही भारताला कनिष्ठ महिलांच्या आशियाई हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानकडून ४-५ असा पराभव स्वीकारावा लागला.
उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत पूर्ण वेळेनंतर २-२ अशी बरोबरी झाली होती. चौथ्या मिनिटाला दीपग्रेस एक्काने भारतास आघाडी मिळवून दिली. मात्र १८व्या मिनिटाला जपानची कर्णधार युकारी मानोने गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. २५व्या मिनिटाला भारतास गोल करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत रेणुका यादवने गोल करीत संघास आघाडी मिळवून दिली. भारताने बराच वेळ ही आघाडी राखली होती. मात्र ५८व्या मिनिटाला जपानच्या अयाना हिराहाराने सुरेख गोल करीत सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.
पूर्ण वेळेत हीच बरोबरी कायम राहिल्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा उपयोग करण्यात आला. मात्र, त्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. त्यामध्ये भारताकडून नवज्योत कौर व प्रीती दुबे या दोनच खेळाडू गोल करू शकल्या. जपानच्या तीन खेळाडूंनी गोल करीत संघाला विजय मिळवून दिला.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2015 रोजी प्रकाशित
भारतीय महिलांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात
उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत पूर्ण वेळेनंतर २-२ अशी बरोबरी झाली होती.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 13-09-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian hockey match indian ladies team loose