रांची : कसोटीसारख्या कठीण क्रिकेट प्रारूपात सहजासहजी संधी मिळत नसते. यशासाठी जे खेळाडू भुकेलेले असतात त्यांच्यासाठी संधी वाट बघत असते, अशा शब्दांत भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघात प्रवेश मिळविण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व खेळाडूंना कडक इशारा दिला.

इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून भारताने मायदेशात सलग १७ कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने सर्फराज खान, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप या प्रत्येक युवा खेळाडूने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आणि त्याच वेळी आपल्याला संघ कसा असावा याविषयी स्पष्ट मतप्रदर्शन केले.

Vikram Rathour on Shubman Gill
Shubman Gill : ‘एक दिवस शुबमन तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल…’, माजी बॅटिंग कोचचे मोठे वक्तव्य
Sri Lanka Announces T20I Squad for The India Series
IND vs SL: टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, नव्या कर्णधाराची केली घोषणा; अनुभवी खेळाडूला डच्चू
Shashi Tharoor criticizes BCCI
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’
Shubman Gill has no idea about captaincy
Shubman Gill : शुबमनच्या नेतृत्त्वावर अमित मिश्राने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘त्याला कर्णधारपदाबद्दल काहीच माहिती नाही…’
Hardik Pandya pulled out of ODI series
IND vs SL : टीम इंडियाला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण?
euro 24 england vs netherlands match prediction
इंग्लंडला कामगिरीत सुधारणेची आस; आज नेदरलँड्सविरुद्ध उपांत्य लढत; प्रमुख खेळाडू चमकण्याची गरज
Chris Gayle Stormy Half Century
WCL 2024 : ४४व्या वर्षी ख्रिस गेलचा झंझावात; चौकार-षटकारांनी पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO व्हायरल
Dinesh Lad shared a funny story of Rohit's
“यावेळी १०० अंडी आणून ठेवतो बघू…”, रोहित शर्माबद्दल बालपणीच्या कोचचे मजेशीर वक्तव्य, जाणून घ्या काय आहे कारण?

हेही वाचा >>>Ranji Trophy : मध्य प्रदेशची सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक! कर्नाटकला २६८ धावांची गरज, तर मुंबईकडे ४१५ धावांची आघाडी

‘‘ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन कधीच विचार करणार नाही. जर, खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल आणि त्यांना काहीच करायचे नसेल, तर त्यांना संघात घेऊन काय करायचे आहे,’’असे स्पष्ट मत रोहितने मांडले.

आपली लय सिद्ध करण्यासाठी रणजी स्पर्धेत खेळण्याचा ‘बीसीसीआय’चा सल्ला धुडकावणाऱ्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या भूमिकेनंतर रोहितने सोमवारी दिलेल्या इशाऱ्याला खूप महत्त्व येते. ‘‘ज्या खेळाडूला यशाची भूक नाही तो खेळाडू मला संघात नको आहे. जे संघात आहेत आणि जे नाहीत त्या सर्वानी या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे. आधीच कसोटी क्रिकेटमध्ये खूप कमी संधी मिळतात आणि मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा नसेल, तर संघापासून दूर राहा,’’असा कडक इशारा रोहितने दिला.

रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे सोडून किशन मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांडय़ासोबत नुकताच बडोद्यात ‘आयपीएल’चा सराव करताना आढळून आला. ‘आयपीएल’सारख्या लीग युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटपासून दूर नेत आहेत का असे विचारल्यावर रोहितने कुणाचेही नाव घेतले नाही. पण, कसोटी क्रिकेट हे कठीण आहे. तेथे खेळण्यासाठी तुम्हाला झोकून द्यावे लागते. संधी मिळाल्यावर ती तुम्ही टिकवून ठेवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, तर काही एक उपयोग नाही. येथे तुम्हाला खेळावेच लागते. संघ व्यवस्थापानाने संघ कसा असावा हे निश्चित केले आहे. त्यात बदल होत नाही, असे रोहित म्हणाला.