R Ashwin reveals about pressure IND vs PAK Match Champions Trophy 2025 : भारतीय संघ गुरुवारपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध असेल. यानंतर, भारताचा पुढचा सामना त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध असेल. २३ फेब्रुवारी रोजी, हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहाव्यांदा एकमेकांविरुद्ध खेळतील. तत्पूर्वी या सामन्याबद्दल आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

गेल्या वेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (२०१७) पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. तथापि, यावेळी भारतीय संघ बदला घेण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल. त्याच वेळी, माजी भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानचा सामना करताना सध्याचा भारतीय संघ कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नाही. आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने २१ पैकी १६ सामने जिंकले आहेत, तर फक्त चार सामने गमावले आहेत.

भारतीय संघावर पाकिस्तानच्या तुलनेत जास्त दबाव नसतो –

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “सध्या जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळतात, तेव्हा भारतीय संघावर पाकिस्तानच्या तुलनेत जास्त दबाव नसतो. सध्या पाकिस्तानविरुद्ध सामना असताना भारतीय संघ बराच निश्चिंत असतो. पाकिस्तानी संघ खूप दबावाखाली असतो आणि त्यांच्या खेळाडूंकडे पाहून हे स्पष्ट जाणवते. असे दिसते की ते खूप दबावाखाली खेळत आहेत. ते थोडे दुखावते पण मला वाटते की या पाकिस्तानी संघात गुणवत्ता आहे आणि ते काहीतरी करू शकतात. जर त्यांचा दिवस असेल तर ते भारतापेक्षा चांगले प्रदर्शन करू शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विन पुढे म्हणाला, “ही भारतीय टीम एक चॅम्पियन टीम आहे. मला फक्त संघातील पाच स्पिनर्सबद्दल शंका आहे. ही अशी टीम आहे ज्याच्याकडे चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे आणि सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. मी हे लवकर सांगत आहे पण मला वाटतं जर भारताने दुबईमध्ये दोनदा टॉस जिंकला तर भारत किंवा न्यूझीलंडचा अंतिम सामना जवळजवळ निश्चित आहे. हा लवकर निर्णय आहे पण मला वाटतं की भारत अंतिम फेरीत पोहोचेल. माझे चार पात्रता संघ भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि