आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने आपण सर्वांनी अनुभवले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात तब्बल २० सामने शेवटच्या षटकापर्यंत रंगले होते. मात्र केरळमधील एका स्थानिक सामन्यामध्ये संघ ४ धावांमध्ये माघारी परतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळच्या मालापुरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौड संघात सामना खेळवण्यात येत होता. पेरिनथमाला मैदानावरील सामन्यात कासारगौड संघ अवघ्या ४ धावांवर माघारी परतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या संघातला अकरावा खेळाडूही एकही धाव काढू शकला नाही. कासारगौड संघातले दहाही फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले.

वायनाडच्या गोलंदाजांनी ४ धावा अतिरिक्त स्वरुपात दिल्यामुळे कासारगौड संघाने खातं उघडलं. विजयासाठी आवश्यक असलेलं ५ धावांचं आव्हान वायनाडच्या संघाने पहिल्याच षटकात पूर्ण केलं. या सामन्याची स्थानिक क्रिकेट वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entire team out on 4 runs in local cricket match at kerala
First published on: 16-05-2019 at 14:19 IST