झुरिच (स्वित्झर्लंड) : अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेली बंदी ११ दिवसांनी उठवण्याचा निर्णय ‘फिफा’ने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘एआयएफएफ’च्या कारभारात होत असलेल्या प्रशासकीय समितीच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने १५ ऑगस्ट रोजी बंदी घातली होती. ‘फिफा’ समितीने ‘एआयएफएफ’वरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातच होईल, असे ‘फिफा’ने ‘एआयएफएफ’ला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समिती हटवण्याच्या आदेश दिल्यानंतर ‘फिफा’ने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. ‘एआयएफएफ’च्या होणाऱ्या निवडणुकीवर ‘फिफा’ व ‘एएफसी’ यांची नजर राहील. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मदत केली जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.