IND vs AUS Final Match Highlight: सूर्यकुमार यादव (३६ चेंडूंत ६९ धावा) आणि विराट कोहली (४८ चेंडूंत ६३) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि निर्णायक T-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी आणि एक चेंडू राखून सरशी साधली. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या संपूर्ण T20I मालिकेत कमाल केमिस्ट्री दिसून आली. अगदी आधी मोहाली येथील पहिल्या सामन्यात रोहितने कार्तिकचा गळा धरण्यापासून ते अंतिम सामन्यात रोहितने कार्तिकचे कौतुक करून किस करण्यापर्यंत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नागपूर येथील दुसऱ्या गेममध्येसुद्धा रोहित तुफान बॅटिंग करताना नॉन स्ट्रायकरवर असलेल्या दिनेश कार्तिकचे कौतुक करण्यास विसरला नाही. इतकेच नव्हे तर कालच्या विजयानंतरही रोहितने केलेली एक कृती त्याच्या व दिनेश कार्तिकच्या मैत्रीची साक्ष देते.

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची मालिका २-१ अशी फरकाने जिंकली. यानंतर रोहितने संघासह फोटो काढताना विजयी ट्रॉफी कार्तिकच्या हाती दिली. रोहित सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला की, संघातील वेगवेगळ्या खेळाडूंनी पुढे जाणे, प्रगती करणे एक संघ म्हणून सर्वांच्या हिताचे असते. T20 मध्ये आम्ही सुधारणेच्या प्रत्येक संधीचा वापर केला आहे अजूनही बरीच सुधारणा होणे बाकी आहे. पण एका तगड्या संघाविरुद्ध विश्रांतीनंतर पुनरागमन करणे सोपे नाही.”

Deepti Sharma Controversy: तेंडुलकर ‘लकी’ होता नाहीतर त्याला… टीका होताच स्टुअर्ट ब्रॉड भडकला, पाहा पूर्ण चॅट

.. अन रोहित शर्माने ट्रॉफी उचलली

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध या विजयासह भारताने एका वर्षात T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20I मधील विजय हा भारताचा २०२२ मधील T20I मधील २१ वा विजय होता. मागील विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर होता, ज्याने २०२१ मध्ये २० T20I सामने जिंकले होते. भारताने या वर्षी मायदेशात १० T20I सामने जिंकले आहेत.