India vs Australia 4th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. एकीकडे हा सामना जिंकून अजेय आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य असेल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मालिकेत २-२ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. रायपूरच्या मैदानावर फलंदाज किंवा गोलंदाजाला मदत खेळपट्टी असू शकते असा अंदाज आहे. कसे असेल रायपूरचे हवामान आणि खेळपट्टी तसेच, स्टेडियमची आकडेवारी जाणून घेऊ या.

अशी आहे रायपूरची खेळपट्टी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. हे स्टेडियम आज पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करणार आहे. खेळपट्टीबद्दल जर बोलायचे झाले तर गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, येथे दव हा एक मोठा घटक ठरू शकतो. नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना फिरकीपेक्षा जास्त मदत मिळते.

Indian domestic cricketer salary
BCCI : भारताचे देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपेक्षा मिळणार जास्त मानधन
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

हेही वाचा: IND vs AUS: श्रेयसच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत, चाहरलाही मिळू शकते संधी; जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

 हवामान कसे असेल?

१ डिसेंबर रोजी रायपूरमधील हवामानाचा अहवाल पाहिला तर संध्याकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, खेळादरम्यान कमाल तापमान १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जरी सामन्याच्या दिवसापूर्वी पाऊस पडत असला तरी आज पावसाची शक्यता नाही. त्यामुळे चाहत्यांना या सामन्याचा पुरेपूर आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता नाही.

असे स्टेडियमचे रेकॉर्ड आहेत

या स्टेडियमच्या रेकॉर्डबद्दल जर सांगायचे तर, आतापर्यंत येथे एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केलेला नाही. या वर्षी फक्त एक आंतरराष्ट्रीय सामना झाला आहे, तो एकदिवसीय स्वरूपाचा होता. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १०८ धावांनी पराभव करत सामना ८ विकेट्स जिंकला. या स्टेडियममध्ये आतापर्यंत प्रथम श्रेणी दर्जाचे २९ टी-२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १३ सामने जिंकले आहेत आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने १६ सामने जिंकले आहेत. येथे संघाची सर्वोच्च धावसंख्या २०६ आहे, तर सर्वात कमी संघाची धावसंख्या ९२ आहे.

हेही वाचा: IND vs SA: टी-२० विश्वचषकात रोहित कर्णधार होणार? स्पर्धेपूर्वी भारत खेळणार आठ सामने; आयपीएलनंतर BCCI घेणार निर्णय

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, आवेश खान, दीपक चाहर, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा, रवी बिश्नोई.

ऑस्ट्रेलिया: मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टीम डेव्हिड, बेन ड्वाराहुसी, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, आरोन हार्डी, ट्रॅविस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.