scorecardresearch

IND vs AUS: अजब गजब विधान करत रोहितने पाकिस्तानला केले ट्रोल! म्हणतो, “ कसोटी सामने बघून कंटाळलेली लोकं…”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत पाकिस्तानला ट्रोल करत तिथेही कमी दिवसात कसोटी सामना संपतो असे विधान केले.

IND vs AUS: Like Pakistan test match Rohit don’t want to make our matches boring hence the match gets over in just 3 days
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आल्यापासून खेळपट्टीबाबत बराच गदारोळ सुरू आहे. नागपूर आणि दिल्लीपाठोपाठ इंदोर कसोटीही तीन दिवसांत संपली. एका दिवसात सलग तीन कसोटी संपल्यानंतर रोहित शर्माला पुन्हा एकदा खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तेव्हा कर्णधार भडकला. रोहित शर्मा म्हणाला की, “भारताबाहेरही पाच दिवस मॅचेस होत नाहीत, पाकिस्तानमध्ये जिथे पाच दिवस मॅचेस खेळले जातात, तिथे लोक कंटाळले होते, असे सांगितले.”

पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “सामना पाच दिवस चालवण्यासाठी खेळाडूंना चांगला खेळ करावा लागतो. पाच दिवस भारताबाहेर सामने होत नाहीत. नुकताच दक्षिण आफ्रिकेतील सामनाही तीन दिवसांत पूर्ण झाला. पाकिस्तानातील लोक म्हणत होते की ते कंटाळवाणे होत आहे म्हणून आम्ही ते मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

हेही वाचा: IND vs AUS: “माजी क्रिकेटपटूंना बोलायला काय जातं…!” भारताचा कर्णधार रोहित शर्मा टीकाकरांवर भडकला

मी तुम्हाला सांगतो, “अलीकडे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड सारख्या अनेक मोठ्या संघांनी पाकिस्तानला भेट दिली, जिथे फलंदाजांनी रस्त्यासारख्या सपाट ट्रॅकवर खूप धावा केल्या. यादरम्यान अनेक सामने अनिर्णित राहिल्याने पाकिस्तानचे चाहते कंटाळले.” याशिवाय रोहित शर्मा म्हणाला, “लोक भारतातील खेळपट्ट्यांबद्दल इतके का विचारतात? नॅथन लायनने किती चांगली गोलंदाजी केली, पुजारा आणि ख्वाजा किती चांगला खेळला हे तुम्ही मला का विचारत नाही. आम्ही खेळपट्ट्यांवर खूप लक्ष देतो.”

मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकलेला भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १०९ धावा करू शकलेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उत्तम फलंदाजी करत ८८ धावांची आघाडी मिळवली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात १६३ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ७६ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त एक बळी गमावत १८.५ षटकातच ७८ धावा करून सामना जिंकला. यासह मालिका देखील २-१ अशा फरकावर आली.

हेही वाचा: IND vs AUS: “भारतीय संघाला अतिआत्मविश्वास नडला!” भारताचे माजी प्रशिकाकडून टीम इंडियाची कानउघडणी

भारतीय संघाच्या या पराभवानंतर बोलताना समालोचक व भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला, “तुम्ही मायदेशात असे होऊ शकत नाही. मला वाटते इथे कर्णधार म्हणून रोहित थोडासा कमी पडला.‌ कारण, तुमच्याकडे इतर पर्याय असताना देखील तुम्ही सर्वांवर विश्वास दाखवला नाही. अश्विन आणि जडेजा उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. मात्र, त्यांच्याकडून काही न झाल्यास अक्षर पटेलला थोडी संधी द्यायला हवी होती. अश्विनला चेंडू आवडला नव्हता. तरीदेखील त्याने दहा षटके टाकली.” ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात केवळ १८.३ षटकात विजयासाठी मिळालेले ७६ धावांचे आव्हान पार केले. मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 19:31 IST