भारतीय संघ ६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २०१८ हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या दृष्टीने टीम इंडियासाठी फारसे चांगले राहिलेले नाही. भारतीय संघाने परदेश दौऱ्यावर सलग दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत, पण तरीदेखील ICC कसोटी क्रमवारीतील भारत अव्वल स्थानी कायम आहे. पण आता भारताच्या अव्वल स्थानाला धोका निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलिया मालिकेत भारताने विजय मिळवला नाही तर भारताचे अव्वल स्थान जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ सध्या या स्थानाच्या जवळपास असून अव्वल स्थानासाठी भारताला टक्कर देऊ शकतात.

भारताला अव्वल स्थान टिकवायचे असल्यास ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश टाळावा लागेल. तसेच जर भारताने ४- ० अशी मालिका जिंकली, तर भारत १२० गुणांसह अव्वल स्थानी कायम राहील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus virats team india need to win test series against australia to be on top
First published on: 27-11-2018 at 13:22 IST